शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नवी मुंबई-‘गेट वे’ प्रकल्प दोन वर्षांत

By admin | Updated: July 27, 2016 02:31 IST

वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प

मुंबई : वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.संदीप नाईक, पांडुरंग बरोरा, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यासाठी साधारणपणे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी या मार्गावरील सर्व सुरक्षा तपासून साधारणपणे मार्च २०१८ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात या मार्गावरील जलवाहतूक सुरू होईल. नवीन भाऊचा धक्का (मुंबई) ते नेरु ळ, नवी मुंबई अशी जलवाहतूक व्यवस्था तयार करण्यात येत आहे. पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक सुरू करण्यासाठी नवीन भाऊचा धक्का येथे मुंबई बंदर विश्वस्त मंडळ, केंद्र शासन, तसेच नेरु ळ- नवी मुंबई येथे सिडको आणि अलिबागच्या मांडवा येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामाफत जलप्रवासी टर्मिनलची उभारणी करण्यात येत आहे. मांडवा येथे करावयाच्या जलप्रवासी प्रकल्प टर्मिनलच्या कामाची निविदा निश्चित करण्यात आली असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, जलवाहतुकीच्या अंतर्गत भाऊचा धक्का येथील ११० कोटीचे काम पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून होणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. धक्क्यावर लाट अडविण्यासाठी १३५ कोटींचे काम असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. बांद्रा ते दहिसर मार्गावर जलवाहतूक सुरु करण्याच्या सूचनेचा विचार केला जाईल. त्यासाठी सल्लागार नेमून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर मग त्याबाबत निर्णय घेतला जाईल. (विशेष प्रतिनिधी)नवी मुंंबई विमानतळाच्या अडचणी व अडथळे असून कधी दूर करणार अशी विचारणा पतंगराव कदम यांनी केली, तेव्हा या विमानतळासाठी शासकीय अडथळे नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.