शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवापुरातील राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 15:33 IST

नवापुरा हा मतदारसंघ काँग्रेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्यावेळी मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांनी २१ हजार ९७९ मताधिक्य मिळवले होते.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपेल्या असून, इच्छुकांनी आप-आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नवापूर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांचा मुलगा शिरीष नाईक हे यावेळी काँग्रेसकडून रिंगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असून, त्यांना युतीची उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवापुराच राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती येणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

नवापुरा हा मतदारसंघ काँग्रेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्यावेळी मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांनी २१ हजार ९७९ मताधिक्य मिळवले होते. मात्र आता त्याच काँग्रेसमध्ये आता दुफळी निर्माण झाली आहे. १९८१ ते २०१४ पर्यंत ३३ वर्ष काँग्रेसचे खासदार राहिलेले माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत यांना लोकसभेला काँग्रेसनं तिकिट नाकारलं. त्यामुळं ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी सुद्धा केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाईक आणि गावीत कुटुंबातील नव्या पिढीच्या हातात नवापुराच्या राजकरणाचे सूत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

नवापुरा मतदारसंघात नाईक आणि गावीत कुटुंबाचे वर्चस्व आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या ताकदीने आजपर्यंत काँग्रेसनं आपला गड कायम ठेवला आहे. मात्र आता गावीत भाजपमध्ये जाणार असल्याने त्यांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर असणार आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे शरद गावीत हे सुद्धा इच्छुक असून, उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे मतदारसंघातील बदलणारे राजकरण यावेळी कुणाला विधानसभेत पाठवणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

स्वातंत्र्यानंतर २००९ चा अपवाद वगळता या मतदारसंघात सर्व आमदार काँग्रेस पक्षाचे राहिलेत. केंद्रात कुणाची ही सत्ता आली तरीही येथील मतदारांनी आजपर्यंत काँग्रेसलाच पसंती दिली आहे . मात्र मागील पाच वर्षात पुलाखालून बरच पाणी गेले आहेत. तसेच भरत गावीत यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर, काँग्रेससाठी यावेळी लढत खडतर असणार आहे. त्यातच राजकरणाचे सूत्रं दोन्ही दिग्गज नेत्यांच्या नव्या पिढीच्या हाती येणार असल्याने यावेळी लढत चुरशीची ठरणार आहे.