शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 15:33 IST

नवापुरा हा मतदारसंघ काँग्रेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्यावेळी मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांनी २१ हजार ९७९ मताधिक्य मिळवले होते.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपेल्या असून, इच्छुकांनी आप-आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नवापूर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांचा मुलगा शिरीष नाईक हे यावेळी काँग्रेसकडून रिंगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असून, त्यांना युतीची उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवापुराच राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती येणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

नवापुरा हा मतदारसंघ काँग्रेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्यावेळी मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांनी २१ हजार ९७९ मताधिक्य मिळवले होते. मात्र आता त्याच काँग्रेसमध्ये आता दुफळी निर्माण झाली आहे. १९८१ ते २०१४ पर्यंत ३३ वर्ष काँग्रेसचे खासदार राहिलेले माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत यांना लोकसभेला काँग्रेसनं तिकिट नाकारलं. त्यामुळं ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी सुद्धा केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाईक आणि गावीत कुटुंबातील नव्या पिढीच्या हातात नवापुराच्या राजकरणाचे सूत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

नवापुरा मतदारसंघात नाईक आणि गावीत कुटुंबाचे वर्चस्व आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या ताकदीने आजपर्यंत काँग्रेसनं आपला गड कायम ठेवला आहे. मात्र आता गावीत भाजपमध्ये जाणार असल्याने त्यांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर असणार आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे शरद गावीत हे सुद्धा इच्छुक असून, उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे मतदारसंघातील बदलणारे राजकरण यावेळी कुणाला विधानसभेत पाठवणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

स्वातंत्र्यानंतर २००९ चा अपवाद वगळता या मतदारसंघात सर्व आमदार काँग्रेस पक्षाचे राहिलेत. केंद्रात कुणाची ही सत्ता आली तरीही येथील मतदारांनी आजपर्यंत काँग्रेसलाच पसंती दिली आहे . मात्र मागील पाच वर्षात पुलाखालून बरच पाणी गेले आहेत. तसेच भरत गावीत यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर, काँग्रेससाठी यावेळी लढत खडतर असणार आहे. त्यातच राजकरणाचे सूत्रं दोन्ही दिग्गज नेत्यांच्या नव्या पिढीच्या हाती येणार असल्याने यावेळी लढत चुरशीची ठरणार आहे.