शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

नवापुरातील राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 15:33 IST

नवापुरा हा मतदारसंघ काँग्रेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्यावेळी मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांनी २१ हजार ९७९ मताधिक्य मिळवले होते.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपेल्या असून, इच्छुकांनी आप-आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नवापूर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांचा मुलगा शिरीष नाईक हे यावेळी काँग्रेसकडून रिंगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असून, त्यांना युतीची उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवापुराच राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती येणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

नवापुरा हा मतदारसंघ काँग्रेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्यावेळी मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांनी २१ हजार ९७९ मताधिक्य मिळवले होते. मात्र आता त्याच काँग्रेसमध्ये आता दुफळी निर्माण झाली आहे. १९८१ ते २०१४ पर्यंत ३३ वर्ष काँग्रेसचे खासदार राहिलेले माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत यांना लोकसभेला काँग्रेसनं तिकिट नाकारलं. त्यामुळं ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी सुद्धा केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाईक आणि गावीत कुटुंबातील नव्या पिढीच्या हातात नवापुराच्या राजकरणाचे सूत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

नवापुरा मतदारसंघात नाईक आणि गावीत कुटुंबाचे वर्चस्व आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या ताकदीने आजपर्यंत काँग्रेसनं आपला गड कायम ठेवला आहे. मात्र आता गावीत भाजपमध्ये जाणार असल्याने त्यांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर असणार आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे शरद गावीत हे सुद्धा इच्छुक असून, उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे मतदारसंघातील बदलणारे राजकरण यावेळी कुणाला विधानसभेत पाठवणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

स्वातंत्र्यानंतर २००९ चा अपवाद वगळता या मतदारसंघात सर्व आमदार काँग्रेस पक्षाचे राहिलेत. केंद्रात कुणाची ही सत्ता आली तरीही येथील मतदारांनी आजपर्यंत काँग्रेसलाच पसंती दिली आहे . मात्र मागील पाच वर्षात पुलाखालून बरच पाणी गेले आहेत. तसेच भरत गावीत यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर, काँग्रेससाठी यावेळी लढत खडतर असणार आहे. त्यातच राजकरणाचे सूत्रं दोन्ही दिग्गज नेत्यांच्या नव्या पिढीच्या हाती येणार असल्याने यावेळी लढत चुरशीची ठरणार आहे.