शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

ट्रकचालकांचा देशव्यापी संप; दाेन दिवसांत राज्याला ५०० कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 06:19 IST

संप अजूनही सुरू राहिल्यास राज्यातील मालवाहतुकीची स्थिती गंभीर होईल, अशी स्थिती आहे.

मुंबई : ट्रकचालकांच्या देशव्यापी संपात राज्यातील जवळपास १७ लाख ट्रक, टँकर, अवजड वाहने सहभागी झाल्याने अवघ्या दोन दिवसांत राज्याच्या अर्थव्यवस्थेला ५०० कोटींचा फटका बसल्याचा दावा वाहतूकदारांच्या संघटनेने केला आहे. भाजीपाला, फळे-फुले, धान्य, साखर, मसाले, बांधकामाचे साहित्य यांना मोठा फटका बसला आहे. संप अजूनही सुरू राहिल्यास राज्यातील मालवाहतुकीची स्थिती गंभीर होईल, अशी स्थिती आहे.

राज्यात १५ लाख, तर मुंबईत दोन लाख ट्रक आहेत. एका ट्रकमागे किमान ३,५०० रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपामुळे राज्याला साधारणतः ५०० कोटींचा फटका बसला आहे. तसेच ट्रकचालकांच्या संपामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ लागला असल्याची माहिती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी दिली.

ज्या शाळा मंगळवारी सुरू झाल्या, त्यांच्या बसही डिझेल मिळत नसल्याने धावू शकल्या नाहीत. राज्यातील मालवाहतूक ठप्प झाली हाेती. त्यासोबतच पेट्रोल-डिझेल वितरणावरही परिणाम झाला हाेता. संप आणखी काही काळ सुरु राहिला असता तर भाजीपाला, धान्य पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असता. 

ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम पेट्रोल-डिझेल वितरणावर झाला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या संपामुळे कित्येक ठिकाणी पेट्रोल-डिझेल पोहोचू शकले नाही. त्यामुळे मुंबईतील २५० पैकी २२५ पेट्रोल पंप बंद करावे लागले. या आंदोलनाबाबत लवकरात लवकर तोडगा निघाला नाही, तर उद्या उर्वरित पेट्रोल पंप बंद होण्याच्या मार्गावर आहेत.- चेतन मोदी, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, मुंबई 

टॅग्स :agitationआंदोलनMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार