शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 4:41 AM

एनटीसीएकडून सर्वेक्षणाचे आदेश : वन्यपशूंच्या अपघाती मृत्यूबाबत शासन चिंतित

गणेश वासनिक ।अमरावती : राज्यात व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाघांसह इतर वन्यपशुंच्या वाढत्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या संख्येने शासन चिंतीत आहे. त्यामुळे वन्यपशुंचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील मार्ग बदलविण्याचा प्रस्ताव असून, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीने (एनटीसीए) सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. विशेषत: महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.एनटीसीएने देशभरातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांकडून जंगलातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गांची माहिती मागविली आहे.या मार्गामुळे आतापर्यंत अपघातात झालेल्या वन्यपशुंची आकडेवारी नमूद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील पेंच, ताडोबा, मेळघाट, बोर अभयारण्य, सह्याद्री, टिपेश्वर आदी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रसंचालकांनी त्याअनुषंगाने सर्वेक्षण सुरू केले आहे. यापूर्वी एनटीसीएच्या सर्वेक्षणानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीतरस्ते आणि रेल्वे अपघातात सुमारेचार लाख वन्यपशू मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.वन्यपशुंचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांचे संवर्धन, संरक्षण करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.‘जयचंद’ वाघ दीड महिन्यापासून बेपत्ताच्भिवापूर (नागपूर) : जय हा वाघ दोन वर्षांपासून बेपत्ता असतानाच आता त्याचा बछडा ‘जयचंद’चेही ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून मिळेनासे झाले आहे. नागपुरातील उमरेड-कºहांडला आणि भंडाºयातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वनपरिक्षेत्रात त्याच्या पाऊलखुणाही दिसत नसताना; वन विभागाकडून त्याला शोधण्यासाठी हालचाली होताना दिसत नाहीत.च्उमरेड-कºहांडला अभयारण्याची ‘ओळख’ ठरलेला जय १८ एप्रिल २०१६पासून बेपत्ता आहे. त्याच्याप्रमाणेच शरीरयष्टी व रुबाब असलेला जयचंद हा जयची उणीव भरून काढत होता. मात्र तोही अचानक बेपत्ता झाला. त्याचे शेवटचे लोकेशन फेब्रुवारी २०१८ मध्ये ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) वनपरिक्षेत्रात आढळल्याचे वनअधिकाºयांनी सांगितले, तो कालव्यात पडला.  वनअधिकाºयांच्या अनास्थेमुळे जयचंद १० जानेवारी २०१८ रोजी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडला होता. त्याच्या सध्याच्या लोकेशनबाबत पवनी वनपरिक्षेत्राचे आरएफओ (वन्यजीव) बाबा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.बफर झोनमधील रस्ते धोकादायकताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन असलेल्या मध्य चांदा विभाग, चंद्रपूर वनविकास महामंडळातून जाणारा रस्ता, तर मूल- चंद्रपूर, बल्लारशा-चंद्रपूर ही रेल्वे लाईन वन्यपशुंसाठी अतिशय धोकादायक असल्याचे वनाधिकाºयांचे मत आहे. मेळघाटातून मध्यप्रदेशकडे, नवेगाव बांधमधून रायपूरमार्गे छत्तीसगड, सह्यांद्री अभयारण्यातून कोल्हापूर, गोव्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग वन्यजीवांसाठी घातक ठरणारा आहे.जंगलातून जाणाºया रस्त्यांचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याच्या सूचना आहेत. वस्तुनिष्ठ अहवाल एनटीसीएकडे पाठविला जाईल.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव नागपूर

टॅग्स :Tigerवाघ