शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आत्मनिर्भर भारतासोबत पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; मुनगंटीवारांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:21 IST

भाजपामधील इनकमिंगवर सुधीर मुनगंटीवार यांचंं सूचक भाष्य

- अतुल कुलकर्णीमुंबई : आवश्यकता असेल तेथे नेते आयात करण्यात गैर काहीच नाही, मात्र आत्मनिर्भर भारतासोबत आत्मनिर्भर पक्ष बनवावा लागेल, असे थेट विधान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

लोकमत यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता अशा अनेक नेत्यांना पक्षाने बाजूला ठेवले याविषयी आपली भूमिका काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, ज्यांच्या कष्टावर, श्रमावर पक्ष मोठा झाला. वाढला आणि ज्यांनी अनेक वर्ष पक्ष विस्तारासाठी काम केले, त्यांना जो पक्ष विसरून जातो, त्या पक्षाला भविष्यात अस्तित्वासाठी खूप संघर्ष करावा लागतो. जुन्या लोकांना विसरून चालत नाही. आम्ही त्याची काळजी घेतो घेत आहोत. भविष्यातही नव्याने पक्षात येणाऱ्या लोकांना कार्यक्षमतेनुसार संधी देण्यात गैर नाही. मात्र जुन्याजाणत्या अनुभवी नेत्यांचा विसर पक्षाने पडू देऊ नये. असे झाले तर पुढचे पाठ, मागचे सपाट होईल. राजकारणात हे होऊ नये, अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भविष्यात हीच भूमिका घेतील असेही मुनगंटीवार म्हणाले.आपण पाच वर्ष वित्तमंत्री होता. आपल्या कार्यकाळात आरोग्य विभागाला किती निधी दिला गेला? असा प्रश्न केला असता मुनगंटीवार म्हणाले, मलाईदार खाती हा प्रकार आता बंद केला पाहिजे. भविष्यात मुख्यमंत्र्यांनी आरोग्य आणि कृषी यासारखी खाती स्वतःकडे ठेवली पाहिजेत. तरच त्याचा उपयोग होईल. कोरोनाचे संकट आता समोर आले. आमच्या काळात हे संकट नव्हते. त्यामुळे या विभागाला निधी दिला पाहिजे हे लक्षात आले नाही. पेट्रोलविना गाडी चालत होती, पण आता लक्षात आले की पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही. त्यामुळे आता यापुढे नक्कीच बदल होतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारPankaja Mundeपंकजा मुंडेEknath Khadaseएकनाथ खडसेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा