शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नाशिक, जळगाव विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी विलंब, मात्र स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 3:24 AM

नाशिक व जळगावची बहुप्रतीक्षित विमानसेवा अखेर शनिवारी सुरू झाली. मुंबईहून विमान दुपारी जळगावला पोहोचताच जळगावकरांनी जल्लोष केला. मुंबईहून निघालेले विमान नाशिकला संध्याकाळी सव्वा सात वाजता पोहोचले. तेथून ते पुढे पुण्याला रवाना झाले.

नाशिक/जळगाव : नाशिक व जळगावची बहुप्रतीक्षित विमानसेवा अखेर शनिवारी सुरू झाली. मुंबईहून विमान दुपारी जळगावला पोहोचताच जळगावकरांनी जल्लोष केला. मुंबईहून निघालेले विमान नाशिकला संध्याकाळी सव्वा सात वाजता पोहोचले. तेथून ते पुढे पुण्याला रवाना झाले.पहिल्याच दिवशी जळगावच्या विमानाला अडीच तास तर नाशिकच्या विमानाला पाऊण तास विलंब झाला. पालकमंत्री गिरीश महाजन, खा. हेमंत गोडसे यांच्यासह अनेक जण नाशिकला विमानाची वाट पाहत उभे होते. या सेवेची दोन्ही शहरांना बºयाच काळापासून प्रतीक्षा होती.नांदेड - अमृतसर सेवेस प्रारंभनांदेड व अमृतसर या ऐतिहासिक शहरांना शनिवारी एअर इंडियाच्या विमानसेवेने जोडण्यात आले. अमृतसर येथून निघालेले विमान दुपारी दीडच्या सुमारास उतरले. परतीच्या प्रवासात नांदेड येथून ८० प्रवासी रवाना झाले. सव्वा दोन तासांत हा प्रवास होणार आहे.एअर डेक्कनच्या विमानाचे शनिवारी दुपारी सव्वा वाजता जळगावला आगमन होणार होते, ते ३ वाजून ४८ मिनिटांनी आले. मुंबई विमानतळावरच जागा न मिळाल्याने विमानाला तेथून निघायलाही विलंब झाला. जळगावात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विमानसेवा सुरू झाली. एअर डेक्कनचे संचालक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जैन उद्योग समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते.दुसºया टप्प्यात राज्यातील आणखी ५ शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणार आहे. सर्वसामान्यांना विमानसेवा मिळावी हे जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन व माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्याचा आनंद कॅ. गोपीनाथ यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Airportविमानतळ