शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नाशिकची धरणे निम्म्याहून अधिक भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 22:21 IST

आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समुहातील सर्व धरण निम्म्याहून अधिक भरली आहेत. गंगापूर धरणाचा जलसाठा ७७ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील काही धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी खोऱ्यावरील गंगापूर धरण समुहात काश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले धरण आहेत. या धरणांमध्ये अनुक्रमे प्रत्येकी १ हजार ४३३, १ हजार २६१ आणि ८०० दलघफू इतका पाणीसाठा आहे. धरणांची क्षमता लक्षात घेता गंगापूर, काश्यपी धरण ७७ टक्के भरले आहेत तर उर्वरित गौतमी ६८ आणि आळंदी ८२ टक्के भरले आहे.तसेच पालखेड धरण समुहाची स्थितीही यंदा उत्तम आहे. कादवा नदीवरील पालखेड धरण ८० टक्के, करंजवण ४६ टक्के तर कोळवण नदीवरील वाघाड ६३ टक्के भरले आहे. उनंदा नदीवरील ओझरखेड ३० टक्के पुणेगाव ६२ टक्के आणि तीसगाव धरण १२ टक्के भरले आहे. दारणा धरणात पाच हजार ७८७ दलघफू इतका जलसाठा असून धरण ८१ टक्के भरले आहे. भावळी धरण हे मध्यम स्वरुपाचे असून १ हजार ४३४ दलघफू जलसाठा या धरणात झाला असून धरण ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. मुकणे ४३ टक्के भरले आहे.वालदेवी आणि कडवा अनुक्रमे ९३ व ८५ टक्के भरले आहेत. भोजापूर धरण ६५ टक्के भरले आहे. तसेच गिरणा खोऱ्यातील चणकापूर ६७ हरणबारी ६९, केळझर ४८ गिरणा ३१ टक्के, पुनद ५१ टक्के भरले आहे.