शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

नाशिकची धरणे निम्म्याहून अधिक भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 22:21 IST

आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समुहातील सर्व धरण निम्म्याहून अधिक भरली आहेत. गंगापूर धरणाचा जलसाठा ७७ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील काही धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी खोऱ्यावरील गंगापूर धरण समुहात काश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले धरण आहेत. या धरणांमध्ये अनुक्रमे प्रत्येकी १ हजार ४३३, १ हजार २६१ आणि ८०० दलघफू इतका पाणीसाठा आहे. धरणांची क्षमता लक्षात घेता गंगापूर, काश्यपी धरण ७७ टक्के भरले आहेत तर उर्वरित गौतमी ६८ आणि आळंदी ८२ टक्के भरले आहे.तसेच पालखेड धरण समुहाची स्थितीही यंदा उत्तम आहे. कादवा नदीवरील पालखेड धरण ८० टक्के, करंजवण ४६ टक्के तर कोळवण नदीवरील वाघाड ६३ टक्के भरले आहे. उनंदा नदीवरील ओझरखेड ३० टक्के पुणेगाव ६२ टक्के आणि तीसगाव धरण १२ टक्के भरले आहे. दारणा धरणात पाच हजार ७८७ दलघफू इतका जलसाठा असून धरण ८१ टक्के भरले आहे. भावळी धरण हे मध्यम स्वरुपाचे असून १ हजार ४३४ दलघफू जलसाठा या धरणात झाला असून धरण ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. मुकणे ४३ टक्के भरले आहे.वालदेवी आणि कडवा अनुक्रमे ९३ व ८५ टक्के भरले आहेत. भोजापूर धरण ६५ टक्के भरले आहे. तसेच गिरणा खोऱ्यातील चणकापूर ६७ हरणबारी ६९, केळझर ४८ गिरणा ३१ टक्के, पुनद ५१ टक्के भरले आहे.