शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नाशिकची धरणे निम्म्याहून अधिक भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 22:21 IST

आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समुहातील सर्व धरण निम्म्याहून अधिक भरली आहेत. गंगापूर धरणाचा जलसाठा ७७ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील काही धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी खोऱ्यावरील गंगापूर धरण समुहात काश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले धरण आहेत. या धरणांमध्ये अनुक्रमे प्रत्येकी १ हजार ४३३, १ हजार २६१ आणि ८०० दलघफू इतका पाणीसाठा आहे. धरणांची क्षमता लक्षात घेता गंगापूर, काश्यपी धरण ७७ टक्के भरले आहेत तर उर्वरित गौतमी ६८ आणि आळंदी ८२ टक्के भरले आहे.तसेच पालखेड धरण समुहाची स्थितीही यंदा उत्तम आहे. कादवा नदीवरील पालखेड धरण ८० टक्के, करंजवण ४६ टक्के तर कोळवण नदीवरील वाघाड ६३ टक्के भरले आहे. उनंदा नदीवरील ओझरखेड ३० टक्के पुणेगाव ६२ टक्के आणि तीसगाव धरण १२ टक्के भरले आहे. दारणा धरणात पाच हजार ७८७ दलघफू इतका जलसाठा असून धरण ८१ टक्के भरले आहे. भावळी धरण हे मध्यम स्वरुपाचे असून १ हजार ४३४ दलघफू जलसाठा या धरणात झाला असून धरण ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. मुकणे ४३ टक्के भरले आहे.वालदेवी आणि कडवा अनुक्रमे ९३ व ८५ टक्के भरले आहेत. भोजापूर धरण ६५ टक्के भरले आहे. तसेच गिरणा खोऱ्यातील चणकापूर ६७ हरणबारी ६९, केळझर ४८ गिरणा ३१ टक्के, पुनद ५१ टक्के भरले आहे.