शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नरेंद्र मोदींची पहिली ‘चाय पे चर्चा’ रंगलेली दाभडीत; पण गावकऱ्यांकडून मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:30 IST

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : पाच वर्षांत विकास कामे झाली नसल्याने रोष

- हरिओम बघेलआर्णी (यवतमाळ) : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ज्या दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा बिगूल फुंकला होता त्याच गावाने आता पाच वर्षानंतर कोणताही विकास न झाल्याने मतदानावर बहिष्काराची घोषणा केली आहे. 

दाभडी हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुका तसेच विधानसभा मतदारसंघ व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. शुक्रवारी २२ मार्च रोजी दाभडी गावात एक बैठक पार पडली. त्यात यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आर्णी पोलिसांच्या नावाने निवेदन तयार करण्यात आले असून त्यावर दाभडीचे उपसरपंच मिलिंद बागेश्वर, माजी सरपंच दिगांबर गुल्हाने यांच्यासह २५ नागरिकांच्या प्रातिनिधीक स्वाक्षऱ्या आहेत. या बहिष्कारामागे विकास कामे हे प्रमुख कारण सांगितले गेले. दाभडी येथील देवस्थान ते गावाला जोडणाऱ्या नादुरुस्त पुलाचे काम गेल्या पाच वर्षांत पूर्ण होऊ शकले नाही हा गावकऱ्यांच्या रोषाचा प्रमुख मुद्दा आहे. या पुलाबाबत चंद्रपूरचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला गेला. मात्र काम न झाल्याने अखेर वैतागून बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बैठकीतील उपस्थितांनी सांगितले. 

याशिवाय गावात अशी अनेक विकास कामे प्रलंबित असल्याचे सांगितले गेले. २०१४ ला नरेंद्र मोदी यांनी याच दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करून सॅटेलाईटद्वारे २३ राज्यातील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला होता. भाजपाचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील असे आश्वासन मोदींनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकरी तर सोडा गेल्या पाच वर्षांत जेथून घोषणा झाली त्या दाभडी गावालाही ‘अच्छे दिन’ आले नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा संयम सुटला व त्यांनी थेट मतदानावरच बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. 

 

गावातील महत्वाचा पूल गेल्या पाच वर्षात सतत पाठपुरावा करूनही पूर्ण होऊ शकला नाही. बाकी विकास कामे तर दूरच राहिली. त्यामुळेच नाईलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकºयांनी घेतला. - अतुल इंगळेशेतकरी, दाभडी ता. आर्णी 

मतदानावरील बहिष्काराबाबत ठराव झाला नाही किंवा ग्रामसभेत चर्चा झाली नाही. गावात विकास कामे सुरू आहे. त्यात पूलसुद्धा केला जाईल. हा पुल नादुरुस्त असून तो दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे हा उपाय होऊ शकत नाही, आम्ही बहिष्कार टाकणार नाही. - मंगला धकातेसरपंच, दाभडी ता. आर्णी.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकFarmerशेतकरी