शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

नरेंद्र मोदींची पहिली ‘चाय पे चर्चा’ रंगलेली दाभडीत; पण गावकऱ्यांकडून मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:30 IST

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : पाच वर्षांत विकास कामे झाली नसल्याने रोष

- हरिओम बघेलआर्णी (यवतमाळ) : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ज्या दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा बिगूल फुंकला होता त्याच गावाने आता पाच वर्षानंतर कोणताही विकास न झाल्याने मतदानावर बहिष्काराची घोषणा केली आहे. 

दाभडी हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुका तसेच विधानसभा मतदारसंघ व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. शुक्रवारी २२ मार्च रोजी दाभडी गावात एक बैठक पार पडली. त्यात यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आर्णी पोलिसांच्या नावाने निवेदन तयार करण्यात आले असून त्यावर दाभडीचे उपसरपंच मिलिंद बागेश्वर, माजी सरपंच दिगांबर गुल्हाने यांच्यासह २५ नागरिकांच्या प्रातिनिधीक स्वाक्षऱ्या आहेत. या बहिष्कारामागे विकास कामे हे प्रमुख कारण सांगितले गेले. दाभडी येथील देवस्थान ते गावाला जोडणाऱ्या नादुरुस्त पुलाचे काम गेल्या पाच वर्षांत पूर्ण होऊ शकले नाही हा गावकऱ्यांच्या रोषाचा प्रमुख मुद्दा आहे. या पुलाबाबत चंद्रपूरचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला गेला. मात्र काम न झाल्याने अखेर वैतागून बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बैठकीतील उपस्थितांनी सांगितले. 

याशिवाय गावात अशी अनेक विकास कामे प्रलंबित असल्याचे सांगितले गेले. २०१४ ला नरेंद्र मोदी यांनी याच दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करून सॅटेलाईटद्वारे २३ राज्यातील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला होता. भाजपाचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील असे आश्वासन मोदींनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकरी तर सोडा गेल्या पाच वर्षांत जेथून घोषणा झाली त्या दाभडी गावालाही ‘अच्छे दिन’ आले नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा संयम सुटला व त्यांनी थेट मतदानावरच बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. 

 

गावातील महत्वाचा पूल गेल्या पाच वर्षात सतत पाठपुरावा करूनही पूर्ण होऊ शकला नाही. बाकी विकास कामे तर दूरच राहिली. त्यामुळेच नाईलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकºयांनी घेतला. - अतुल इंगळेशेतकरी, दाभडी ता. आर्णी 

मतदानावरील बहिष्काराबाबत ठराव झाला नाही किंवा ग्रामसभेत चर्चा झाली नाही. गावात विकास कामे सुरू आहे. त्यात पूलसुद्धा केला जाईल. हा पुल नादुरुस्त असून तो दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे हा उपाय होऊ शकत नाही, आम्ही बहिष्कार टाकणार नाही. - मंगला धकातेसरपंच, दाभडी ता. आर्णी.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकFarmerशेतकरी