शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लवकरच सगळ्यांच्या खात्यात 15 लाख येतील- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:01 IST

बँक खात्यात 15 लाख कधी येणार, हा प्रश्न साडेचार वर्षांपासून सरकारला विचारला जात आहे

सांगली: परदेशातील बँकांमध्ये भारतीयांचा इतका काळा पैसा आहे, की तो देशात आणल्यास प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये येतील, असं नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटलं होतं. यानंतर 15 लाख येणार कधी, असा प्रश्न गेल्या साडेचार वर्षांपासून मोदी सरकारला विचारला जात आहे. आता या 15 लाखांवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. सर्वसामान्यांच्या खात्यात हळूहळू 15 लाख येतील, असं आठवलेंनी म्हटलं आहे. ते सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. 'देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असं आश्वासन मोदींनी 2014 मध्ये देशातील जनतेला दिलं होतं. मात्र इतकी मोठी रक्कम सध्या सरकारकडे नाही. आम्ही आरबीआयकडे पैसै मागत आहोत. पण ते द्यायला तयार नाहीत. यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे हे पैसे नागरिकांना एकाचवेळी मिळणार नाहीत. नागरिकांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा होतील,' असं आठवले म्हणाले. 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी त्यांच्या अनेक सभांमध्ये 15 लाखांचा उल्लेख केला होता. परदेशी बँकांमधील काळा पैसा देशात आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. 'आम्ही सत्तेत आल्यास परदेशातील काळा पैसा देशात आणू. या पैशाचं प्रमाण इतकं जास्त आहे की त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील,' असं मोदींनी अनेक सभांमध्ये म्हटलं होतं.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक