शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

लवकरच सगळ्यांच्या खात्यात 15 लाख येतील- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:01 IST

बँक खात्यात 15 लाख कधी येणार, हा प्रश्न साडेचार वर्षांपासून सरकारला विचारला जात आहे

सांगली: परदेशातील बँकांमध्ये भारतीयांचा इतका काळा पैसा आहे, की तो देशात आणल्यास प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये येतील, असं नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटलं होतं. यानंतर 15 लाख येणार कधी, असा प्रश्न गेल्या साडेचार वर्षांपासून मोदी सरकारला विचारला जात आहे. आता या 15 लाखांवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. सर्वसामान्यांच्या खात्यात हळूहळू 15 लाख येतील, असं आठवलेंनी म्हटलं आहे. ते सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. 'देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असं आश्वासन मोदींनी 2014 मध्ये देशातील जनतेला दिलं होतं. मात्र इतकी मोठी रक्कम सध्या सरकारकडे नाही. आम्ही आरबीआयकडे पैसै मागत आहोत. पण ते द्यायला तयार नाहीत. यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे हे पैसे नागरिकांना एकाचवेळी मिळणार नाहीत. नागरिकांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा होतील,' असं आठवले म्हणाले. 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी त्यांच्या अनेक सभांमध्ये 15 लाखांचा उल्लेख केला होता. परदेशी बँकांमधील काळा पैसा देशात आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. 'आम्ही सत्तेत आल्यास परदेशातील काळा पैसा देशात आणू. या पैशाचं प्रमाण इतकं जास्त आहे की त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील,' असं मोदींनी अनेक सभांमध्ये म्हटलं होतं.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक