शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'केसरकर हा थापेबाज,बंडलबाज माणूस': नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 11:38 IST

पाचशे कोटी आणले म्हणून सांगणारे केसरकर यांची थापेबाजी आता चालणार नाही. सावंतवाडीचे आमदार केसरकर झाले हे दुर्दैव आहे, असे सुद्धा नारायण राणे म्हणाले.

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. "केसरकर हा थापेबाज, बंडलबाज माणूस" असल्याची जहरी टीका राणेंनी केली आहे.

राणे यांनी सोमवारी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर याचवेळी त्यांनी केसरकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. "आमदार दीपक केसरकर हे थापेबाज, बंडलबाज असून, असा माणूस जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभला हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. सावंतवाडीकरांनी अशा माणसाला निवडून देऊन स्वत:ची पीछेहाट करून घेतली" असल्याचे राणे म्हणाले.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, भुयारी गटार योजनेसारख्या नागरी सुविधा केसरकर यांच्या राजवटीत गेल्या पंचवीस वर्षात या शहराला प्राप्त झाल्या नाहीत. पाणीपुरवठा योजना, उद्यान, सांडपाणी व्यवस्थापन, नागरी सुविधा याबाबतीत केसरकर यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे अशा माणसाच्या हातात पुन्हा सत्ता देऊन शहराची पीछेहाट करण्यापेक्षा सावंतवाडी करांनी भाजप वर विश्वास दाखवावा आम्ही सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बांधील आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

तर आपण पाचशे कोटी आणले म्हणून सांगणारे केसरकर यांची थापेबाजी आता चालणार नाही. सावंतवाडीचे आमदार केसरकर झाले हे दुर्दैव आहे, असे सुद्धा नारायण राणे म्हणाले. तर राज्यात तीन पक्षांचे भिन्न विचारसरणीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. बाळासाहेबांनी स्वत: पद घेतले नाही. शिवसैनिकांना नेहमी पदे दिली. मात्र उद्धव ठाकरे अपवाद ठरले असल्याचे सुद्धा राणे म्हणाले.