शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'केसरकर हा थापेबाज,बंडलबाज माणूस': नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 11:38 IST

पाचशे कोटी आणले म्हणून सांगणारे केसरकर यांची थापेबाजी आता चालणार नाही. सावंतवाडीचे आमदार केसरकर झाले हे दुर्दैव आहे, असे सुद्धा नारायण राणे म्हणाले.

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. "केसरकर हा थापेबाज, बंडलबाज माणूस" असल्याची जहरी टीका राणेंनी केली आहे.

राणे यांनी सोमवारी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर याचवेळी त्यांनी केसरकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. "आमदार दीपक केसरकर हे थापेबाज, बंडलबाज असून, असा माणूस जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभला हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. सावंतवाडीकरांनी अशा माणसाला निवडून देऊन स्वत:ची पीछेहाट करून घेतली" असल्याचे राणे म्हणाले.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, भुयारी गटार योजनेसारख्या नागरी सुविधा केसरकर यांच्या राजवटीत गेल्या पंचवीस वर्षात या शहराला प्राप्त झाल्या नाहीत. पाणीपुरवठा योजना, उद्यान, सांडपाणी व्यवस्थापन, नागरी सुविधा याबाबतीत केसरकर यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे अशा माणसाच्या हातात पुन्हा सत्ता देऊन शहराची पीछेहाट करण्यापेक्षा सावंतवाडी करांनी भाजप वर विश्वास दाखवावा आम्ही सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बांधील आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

तर आपण पाचशे कोटी आणले म्हणून सांगणारे केसरकर यांची थापेबाजी आता चालणार नाही. सावंतवाडीचे आमदार केसरकर झाले हे दुर्दैव आहे, असे सुद्धा नारायण राणे म्हणाले. तर राज्यात तीन पक्षांचे भिन्न विचारसरणीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. बाळासाहेबांनी स्वत: पद घेतले नाही. शिवसैनिकांना नेहमी पदे दिली. मात्र उद्धव ठाकरे अपवाद ठरले असल्याचे सुद्धा राणे म्हणाले.