शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"कोकणातून मी शिवसेना संपवली"; नारायण राणेंचा दावा, म्हणाले, "कोणी आडवं आलं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 16:46 IST

खासदार नारायण राणे यांनी कोकणातून शिवसेना संपवल्याचा दावा करत यापुढे कोणाला थारा देणार नाही, असा इशारा दिला आहे.

Narayan Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय झाला आहे. मात्र या विजयानंतर कोकणात महायुतीच्या नेत्यांमध्येच बॅनर वॉर सुरु झालं आहे. लोकसभा निवडणुकीआधी तिकीटावरुन सुरु असलेल्या राणे विरुद्ध सामंत वादाने आता पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे. त्यातूनचा आता दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. मात्र यामुळे महायुतीमधला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेबाबत धक्कादायक विधान केलं आहे. कोकणातूनशिवसेना मी संपवली असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना संपवल्याचा दावा केला. आता यापुढे कोणाला थारा देणार नाही. आमच्या समोर कोणी आडवे कोण आले तर, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बॅनरवॉर पुरते असलेला हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

"आम्ही सांगतो ना आम्हीच येणार ते. आम्ही इथं आहोत आणि राहणार. जसं केंद्रात नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडत नाही. कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. जे कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढेही जाऊ. त्यांचा पायच बाजूला केलाय मी. ही भाषा बोलू नये पण सगळे आडवे झालेत. कोकणात तर आम्ही साफ केलंय. इथे कोणाला शिरू देणार नाही," असा इशारा नारायण राणे यांनी दिला.  

दरम्यान, माजी खासदार नीलेश राणे यांनी तर थेट सामंत बंधूवर आरोप करत निवडणुकीत काम न केल्याचा आरोप केला होता. तसेच  रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदार संघावर दावा केला होता. दोन्ही मतदारसंघ भाजपचे असल्याचे निलेश राणे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिलं होतं. आता नारायण राणे यांनी ही दोन्ही मतदारसंघाबाबत भाष्य केलं आहे.

"येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील सर्व जागांवर भाजपचाच आमदार असेल त्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मी मात्र निमित्त आहे," असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाkonkanकोकणShiv Senaशिवसेना