शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
4
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
5
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
6
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
7
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
8
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
9
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
10
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
11
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
12
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
13
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
14
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
15
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
16
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
17
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
18
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
19
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
20
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...

"कोकणातून मी शिवसेना संपवली"; नारायण राणेंचा दावा, म्हणाले, "कोणी आडवं आलं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 16:46 IST

खासदार नारायण राणे यांनी कोकणातून शिवसेना संपवल्याचा दावा करत यापुढे कोणाला थारा देणार नाही, असा इशारा दिला आहे.

Narayan Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय झाला आहे. मात्र या विजयानंतर कोकणात महायुतीच्या नेत्यांमध्येच बॅनर वॉर सुरु झालं आहे. लोकसभा निवडणुकीआधी तिकीटावरुन सुरु असलेल्या राणे विरुद्ध सामंत वादाने आता पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे. त्यातूनचा आता दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. मात्र यामुळे महायुतीमधला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेबाबत धक्कादायक विधान केलं आहे. कोकणातूनशिवसेना मी संपवली असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना संपवल्याचा दावा केला. आता यापुढे कोणाला थारा देणार नाही. आमच्या समोर कोणी आडवे कोण आले तर, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बॅनरवॉर पुरते असलेला हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

"आम्ही सांगतो ना आम्हीच येणार ते. आम्ही इथं आहोत आणि राहणार. जसं केंद्रात नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडत नाही. कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. जे कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढेही जाऊ. त्यांचा पायच बाजूला केलाय मी. ही भाषा बोलू नये पण सगळे आडवे झालेत. कोकणात तर आम्ही साफ केलंय. इथे कोणाला शिरू देणार नाही," असा इशारा नारायण राणे यांनी दिला.  

दरम्यान, माजी खासदार नीलेश राणे यांनी तर थेट सामंत बंधूवर आरोप करत निवडणुकीत काम न केल्याचा आरोप केला होता. तसेच  रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदार संघावर दावा केला होता. दोन्ही मतदारसंघ भाजपचे असल्याचे निलेश राणे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिलं होतं. आता नारायण राणे यांनी ही दोन्ही मतदारसंघाबाबत भाष्य केलं आहे.

"येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील सर्व जागांवर भाजपचाच आमदार असेल त्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मी मात्र निमित्त आहे," असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाkonkanकोकणShiv Senaशिवसेना