शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले: नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:12 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही राणे म्हणाले.

मुंबई : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची शपथविधी झाल्यापसून भाजपचे नेते नारायण राणेंचा टीकेचा बाण अधिकीच टोकदार झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरेंवर टीका करण्याची कोणतेही संधी ते सोडत नाही. मंगळवारी कुडाळ तालुक्यात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना आमदार व शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

स्वार्थापोटी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एका रात्रीत सर्व अधिकार देऊन शिवसेनेचे आमदार व शिवसैनिकांना अंधारात ठेवून स्वत: मुख्यमंत्री बनले असल्याचा गौप्यस्फोट कुडाळ येथील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी केला. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही राणे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे हे शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करणार असल्याचे बोलत होते.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना तसेच सांगत त्यांना व्यस्त ठेवले. यावेळी मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई,एकनाथ शिंदे व खासदार संजय राऊत यांची नावे पुढे येत होती. मात्र, अशा वेळी महाविकास आघाडीच्या शेवटच्या झालेल्या बैठकीनंतर एका रात्रीत उद्धव ठाकरे, संजय राऊत,आमदार आदित्य ठाकरे हे शरद पवार यांच्या घरी गेले व यावेळी उद्धव ठाकरे यांनी पवार यांना आपण स्वता: मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असून तुम्हीच नाव जाहीर करा, अशी विनंती केली.

त्यांनतर दुसऱ्याच दिवशी पवार यांनी स्वता: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होणार असल्याचे घोषित केलं.असे करताना ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना अंधारात ठेवले तसेच सर्व अधिकार पवार यांना दिल्यामुळे आता त्यांना पवार यांचेच ऐकावे लागणार आहे.बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी जसे त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री न बनविता आम्हा शिवसैनिकांना मुख्यमंत्री केले, तसेच यावेळी ही त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री केले असते,असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.