शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:44 IST

मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

विशेष प्रतिनिधीनागपूर - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरीसाठी कलम ३२/१ नुसार भूसंपादन करण्यासंदर्भातील नोटीस ही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करूनच काढली होती. त्यांनी सादरीकरणही पाहिले. आता त्यांच्याशी बोललो म्हणजे भागेल असे वाटले होते पण आता मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी एकवटत प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी करीत गदारोळ केला. या गदारोळात कामकाज तीनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणारविषयी निवेदनाद्वारे सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्री म्हणाले की प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोरही प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाईल. स्थानिक नागरिक, संस्था, संघटनांना विश्वासात घेऊनच नाणार निर्णय घेऊ. प्रकल्प लादणार नाही. प्रकल्पासाठी सुरुवातीला स्थानिकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. सहमतीदेखील झालेली होती. विरोध केवळ भूसंपादन दराबाबत होता. नंतर एनजीओ सक्रिय झाल्या. पर्यावरणाच्या मुद्यावरून विरोध सुरू झाला. त्यानंतर शिवसेनेकडून विरोध सुरू झाला.या प्रकल्पामुळे पर्यावरणावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. आंबा वा इतर फळबागा उद्ध्वस्त होणार नाहीत. तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाने राज्याची अर्थव्यवस्थाच बदलेल. प्रकल्पाच्या एक-तृतियांश जमिनीवर फक्त हिरवळच असेल. या प्रकल्पासाठी गुजरात, आंध्र प्रदेशही उत्सुक होते. मात्र, केंद्राने महाराष्ट्राला पसंती दिली.समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा आधी विरोध होता पण आम्ही त्यांना प्रकल्पाचे महत्त्व समजून सांगितले. त्यांनी पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे नाणारबाबतही त्यांच्याशी चर्चा करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.अभूतपूर्व गोंधळ, कामकाज ठप्पमुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान न झालेल्या शिवसेना व विरोधी पक्ष सदस्यांनी नाणारविरुद्ध घोषणाबाजी सुरु केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाणारवरून सरकार अल्पमतात आले आहे. भाजपाचे १२३ सदस्य वगळता कुणाचाही प्रकल्पाला पाठिंबा नाही, असा हल्लाबोल केला. नाणार राहणार की जाणार एवढेच सांगा, असे राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी कोकण उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही, असे ठणकावले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाने प्रश्न प्रतिष्ठेचा न करता प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. गोंधळामुळे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले आणि नंतर गोंधळातच आटोपण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnanar refinery projectनाणार प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरे