शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
5
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
6
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
7
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
8
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
9
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
10
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
11
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
12
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
13
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
14
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
16
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
17
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
18
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
19
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
20
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी

नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:44 IST

मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

विशेष प्रतिनिधीनागपूर - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरीसाठी कलम ३२/१ नुसार भूसंपादन करण्यासंदर्भातील नोटीस ही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करूनच काढली होती. त्यांनी सादरीकरणही पाहिले. आता त्यांच्याशी बोललो म्हणजे भागेल असे वाटले होते पण आता मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी एकवटत प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी करीत गदारोळ केला. या गदारोळात कामकाज तीनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणारविषयी निवेदनाद्वारे सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्री म्हणाले की प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोरही प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाईल. स्थानिक नागरिक, संस्था, संघटनांना विश्वासात घेऊनच नाणार निर्णय घेऊ. प्रकल्प लादणार नाही. प्रकल्पासाठी सुरुवातीला स्थानिकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. सहमतीदेखील झालेली होती. विरोध केवळ भूसंपादन दराबाबत होता. नंतर एनजीओ सक्रिय झाल्या. पर्यावरणाच्या मुद्यावरून विरोध सुरू झाला. त्यानंतर शिवसेनेकडून विरोध सुरू झाला.या प्रकल्पामुळे पर्यावरणावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. आंबा वा इतर फळबागा उद्ध्वस्त होणार नाहीत. तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाने राज्याची अर्थव्यवस्थाच बदलेल. प्रकल्पाच्या एक-तृतियांश जमिनीवर फक्त हिरवळच असेल. या प्रकल्पासाठी गुजरात, आंध्र प्रदेशही उत्सुक होते. मात्र, केंद्राने महाराष्ट्राला पसंती दिली.समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा आधी विरोध होता पण आम्ही त्यांना प्रकल्पाचे महत्त्व समजून सांगितले. त्यांनी पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे नाणारबाबतही त्यांच्याशी चर्चा करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.अभूतपूर्व गोंधळ, कामकाज ठप्पमुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान न झालेल्या शिवसेना व विरोधी पक्ष सदस्यांनी नाणारविरुद्ध घोषणाबाजी सुरु केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाणारवरून सरकार अल्पमतात आले आहे. भाजपाचे १२३ सदस्य वगळता कुणाचाही प्रकल्पाला पाठिंबा नाही, असा हल्लाबोल केला. नाणार राहणार की जाणार एवढेच सांगा, असे राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी कोकण उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही, असे ठणकावले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाने प्रश्न प्रतिष्ठेचा न करता प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. गोंधळामुळे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले आणि नंतर गोंधळातच आटोपण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnanar refinery projectनाणार प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरे