शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आघाडीमधील मित्रपक्षांनी  काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:27 IST

जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले.

अंबरनाथ: काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष आहे. काँग्रेस वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी करण्यामागे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच हेतू होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरून काम करू नये. आघाडी आणि महाआघाडीच्या गोंधळात काँग्रेसची ताकद कमी होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. उलन चाळ ते कोहजगावपर्यंत पटोले यांनी पदयात्रा काढली. ब्लॉक काॅंग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यकर्ता मेळाव्यात पाटोळे यांनी केंद्र सरकारवर टीका करून त्यांच्या धोरणांची खिल्ली उडवली. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना आपल्याच पंतप्रधानांवर विश्वास राहिलेला नाही. शेतकरीविरोधातील कायदा मागे घेतला तरी पंतप्रधान आपला शब्द फिरवतील या भावनेतून शेतकरी अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे पटोले म्हणाले. 

‘भाजप सरकारी उद्याेग विकण्याच्या तयारीत’काँग्रेसच्या काळात नवीन उद्योग आणि सरकारी कंपन्या उभारण्याचे काम केले. आता भाजप सरकारच्या काळात सरकारी कारखाने आणि उद्योग विकण्याच्या तयारीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापर्यंतच्या पंतप्रधानांनी देश बलवान करण्याचे काम केले. मात्र, मोदी सरकारने देश विकायला काढला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, प्रभारी कॅप्टन नीलेश पेंढारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसambernathअंबरनाथ