शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

आघाडीमधील मित्रपक्षांनी  काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:27 IST

जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले.

अंबरनाथ: काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष आहे. काँग्रेस वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी करण्यामागे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच हेतू होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरून काम करू नये. आघाडी आणि महाआघाडीच्या गोंधळात काँग्रेसची ताकद कमी होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. उलन चाळ ते कोहजगावपर्यंत पटोले यांनी पदयात्रा काढली. ब्लॉक काॅंग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यकर्ता मेळाव्यात पाटोळे यांनी केंद्र सरकारवर टीका करून त्यांच्या धोरणांची खिल्ली उडवली. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना आपल्याच पंतप्रधानांवर विश्वास राहिलेला नाही. शेतकरीविरोधातील कायदा मागे घेतला तरी पंतप्रधान आपला शब्द फिरवतील या भावनेतून शेतकरी अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे पटोले म्हणाले. 

‘भाजप सरकारी उद्याेग विकण्याच्या तयारीत’काँग्रेसच्या काळात नवीन उद्योग आणि सरकारी कंपन्या उभारण्याचे काम केले. आता भाजप सरकारच्या काळात सरकारी कारखाने आणि उद्योग विकण्याच्या तयारीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापर्यंतच्या पंतप्रधानांनी देश बलवान करण्याचे काम केले. मात्र, मोदी सरकारने देश विकायला काढला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, प्रभारी कॅप्टन नीलेश पेंढारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसambernathअंबरनाथ