शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

आघाडीमधील मित्रपक्षांनी  काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:27 IST

जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले.

अंबरनाथ: काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष आहे. काँग्रेस वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी करण्यामागे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच हेतू होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरून काम करू नये. आघाडी आणि महाआघाडीच्या गोंधळात काँग्रेसची ताकद कमी होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. उलन चाळ ते कोहजगावपर्यंत पटोले यांनी पदयात्रा काढली. ब्लॉक काॅंग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यकर्ता मेळाव्यात पाटोळे यांनी केंद्र सरकारवर टीका करून त्यांच्या धोरणांची खिल्ली उडवली. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना आपल्याच पंतप्रधानांवर विश्वास राहिलेला नाही. शेतकरीविरोधातील कायदा मागे घेतला तरी पंतप्रधान आपला शब्द फिरवतील या भावनेतून शेतकरी अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे पटोले म्हणाले. 

‘भाजप सरकारी उद्याेग विकण्याच्या तयारीत’काँग्रेसच्या काळात नवीन उद्योग आणि सरकारी कंपन्या उभारण्याचे काम केले. आता भाजप सरकारच्या काळात सरकारी कारखाने आणि उद्योग विकण्याच्या तयारीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापर्यंतच्या पंतप्रधानांनी देश बलवान करण्याचे काम केले. मात्र, मोदी सरकारने देश विकायला काढला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, प्रभारी कॅप्टन नीलेश पेंढारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसambernathअंबरनाथ