शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

"नोट बंदच करायची होती तर चलनात आणलीच कशाला?"; नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 23:03 IST

RBIने दोन हजाराच्या नोटांबद्दल घेतलेल्या निर्णयावरून सरकारला काँग्रेसने सरकारला सुनावलं

Nana Patole slams Pm Modi over Rs 2000 Notes by RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेने आज २ हजार रुपयांच्या नोटांबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. दोन हजाराची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय RBIने जाहीर केला. या नोटा चलनातून मागे घेतल्या जात असल्या तरी त्याची कायदेशीर मान्यता कायम राहणार आहे, असेही RBIने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि बदलण्याची मुदत दिली आहे. यासोबतच २ हजार रुपयांच्या नोटा बँकांनी तात्काळ प्रभावने देणं बंद करण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत. २३ मे पासून ग्राहकांना एकावेळी २ हजारांच्या १० म्हणजेच २० हजार रूपये मूल्याच्या नोटा बदलता येणार आहेत. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

"नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक निर्णय चुकीचा होता हे सिद्ध झाले. 2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून बंद होणार. नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकारने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. त्यावेळी सरकारने दावा केला होता की नेटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा संपेल पण ते काही झाले नाही. पंतप्रधानांनी नोटबंदी वेळी केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नाही. उलट रांगेत शेकडो लोकांचे मृत्यू झाले लाखो छोटे उद्योग बंद झाले, अनेकांच्या नोक-या गेल्या कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले. आता कुठे या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत होती, तोवर मोदी सरकारने पुन्हा दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न पडला आहे की दोन हजारांची नोट बंद करायची होती तर चलनात आणलीच कशाला?" असा रोखठोक सवाल नाना पटोलेंनी केला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहरी राजाप्रमाणे वागत आहेत त्यांना अर्थव्यवस्थेचे काही ज्ञान आहे असे त्यांच्या निर्णयावरून वाटतं नाही. कसलाही अभ्यास नाही वस्तुस्थितीचे भान नाही परिणामांची चिंता नाही फक्त आपल्याला वाटते म्हणून काहीही निर्णय घेणे ही पंतप्रधानांची हुकुमशाही मनोवृत्ती आहे हे दिसून येते," असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक