शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Maharashtra Politics: “भारत जोडो योत्रेला प्रचंड जनसमर्थन, देशात परिवर्तन होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 14:28 IST

Maharashtra News: या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून निघालेल्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारधारेला माननारे राज्य आहे. या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड जनसमर्थन तर मिळालेच पण शेगावमध्ये अभूतपूर्व अशी विराट सभा झाली व राज्यातील जनतेने राहुलजींवर प्रेम व विश्वास व्यक्त केला. या पदयात्रेमुळे निर्माण झालेले काँग्रेसमय वातावरण राज्यभर कायम ठेवू, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला.

बुलढाणा जिल्ह्यातील जलंब येथील भारत जोडो यात्रेच्या कॅम्पमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा आता जनआंदोलन झाले आहे आणि ही यात्रा आता कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेने देशात परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट झाले असून खोटे बोलून सत्तेत आलेल्या व नंतर जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सरकार जनताच खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. ही पदयात्रा विशाल होईल व जनतेचे मोठे समर्थन मिळेल असे मी दोन महिन्यापासून सांगत होतो तेव्हा विरोधक आमची खिल्ली उडवत होते पण देगलूरपासून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत मिळालेले जनसमर्थन राहुलजी गांधी व काँग्रेसवरचा विश्वास दृढ करणारे ठरले आहे. आता देशात परिवर्तन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

भारत जोडो यात्रेला महाराष्टातून मोठा प्रतिसाद मिळाला

यावेळी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्टातून मोठा प्रतिसाद मिळाला. शेगावची सभा ही भारत जोडो यात्रेवर प्रेम व विश्वास दाखवणारी विशाल सभा झाली. सभेसाठीची २२ एकर जागा दुपारीच फुल्ल झाली होती. राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी आले होते. तसेच पदयात्रेत महिलांचा सहभाग मोठा होता. बंजारा समाजाच्या ७ ते ८ हजार महिला पदयात्रेत सहभागी होऊन नारीशक्तीचे प्रदर्शन घडवले. मागील वर्षी मोदी सरकारला काळे कृषी कायदे रद्द करावे लागले. स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एवढे मोठे आंदोलन केले त्यात ७०० शेतकरी शहिद झाले अखेर मोदी सरकारला झुकावे लागले व ते काळे कायदे रद्द करावे लागले. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय असून या निमित्ताने ‘शेतकरी विजय दिवस’ पाळला पाहिजे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या संदर्भात वारंवार विचारणी केली जाते की यावर उपाय काय? शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाची कामे या भागात मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला तर विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात, असे ते म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले