शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

LMOTY 2022: नाना पाटेकर म्हणाले, ९ महिन्यांत १०९२ आत्महत्या...; शिंदे, फडणवीसांनी त्यावर सांगितली जबरदस्त योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 07:24 IST

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: शेतकऱ्यांच्या आत्महत्या, न परवडणारी शेती या विषयावर महामुलाखतीत नाना काय म्हणाले...

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या, न परवडणारी शेती या विषयावर महामुलाखतीत नाना काय म्हणाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली जबरदस्त योजना.

नाना : नऊ महिन्यांमध्ये एक हजार ९२ आत्महत्या झालेल्या आहेत, आपण सहजपणे या बातम्या वाचतो आणि पुढचं पान उलटतो. काही विचारले की प्रत्येकाने एकमेकांकडे बोटं दाखवायची. एकनाथराव... पारंपरिक शेती करत असताना आम्हाला ती परवडत नाहीये. हमीभाव नाहीये. कुठलं पीक लावायचं हे सांगणारी माणसं पाहिजेत. आम्ही अडाणी लोक आहोत. आम्हाला कळत नाही. आणि शेती परवडत नाही म्हणून आम्ही जमीन विकत चाललो आहोत. नंतर वेठबिगार होतोय, याचा काही विचार आहे की नाही?

शिंदे : नाना... आपलं सरकार आल्यावर आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायलाच नको, यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना आखल्या. जवळपास ११ हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे. दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. समुद्राकडे वाहून जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचा मोठा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. शेतीला जोडधंदा कसा द्यायचा याचीही चर्चा झाली आहे. आमचे अधिकारी काम करत आहेत. विशेष कृती आराखडा बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात, त्याचं प्रमाणे कमी आलं पाहिजे. जे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. देवेंद्रजी गेली पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांंनी जलयुक्त शिवार योजना मोठी सुरू केली. नंतर ती अडीच वर्षांमध्ये बंद झाली. पुन्हा आम्ही ती सुरू केली आहे. शेवटी जमीन पाण्याखाली आणणं महत्त्वाचे आहे. 

फडणवीस : नाना. याला एकच जोड देतो, जिथे सिंचन आहे तिथे आत्महत्या नाही. जिथे सिंचन नाही तिथेच आत्महत्या आहे. सगळा दुष्काळी पट्टा दूर करण्यासाठी सर्व भाग जलयुक्त शिवारअंतर्गत आला पाहिजे. जलयुक्त शिवारमुळे ३९ लाख हेक्टर जमीन रब्बीच्या पिकाखाली आली, त्यामुळे त्याला दोन पिकं घेता येतात. आमचा संकल्प आहे की वाहून जाणारं पाणी गोदावरीमध्ये जर आणलं. विदर्भातील वाहून जाणारं पाणी बुलडाण्यापर्यंत आणू शकलो तर तो सगळा दुष्काळी पट्टा ओलिताखाली येईल. आपण शेतकऱ्यांना सकाळी अर्धी वीज रात्री अर्धी वीज देतो. त्याला साप विंचवाचा सामना करत रात्रभर काम करावे लागते. म्हणून १०० टक्के ॲग्रीकल्चर फिडर सोलरवर आणतोय. दोन ते तीन वर्षे लागतील, चार हजार मेगावॅटचे सोलर फिडर केले जातील. शेतकऱ्याला रोज दिवसा १२ तास वीज मिळेल. याचे मॉडेल आपण तयार केले आहे. हे सोलार करण्याकरिता आम्हाला जमिनी मिळत नाहीत. म्हणून जो शेतकरी त्याची जमीन भाडे तत्त्वावर देईल, त्याला त्याचे साधारणपणे ६० हजार ते ७५ हजार रुपये भाडे मिळेल. त्याच्या शेतात जेवढे पिकेल, त्यापेक्षा जास्त उत्पादन त्याला मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. हे भाडे त्याला ३० वर्षे देऊ. त्या जमिनीवर सोलार लावून संपूर्ण फिडरवरचे जेवढे शेतकरी आहेत, त्यांना आम्ही १२ तास दिवसा वीज देऊ. एकीकडे विहिरी आपण केलेल्या आहेत. मात्र, वीज नसल्याने पीक सुकतंय. वीज जर दिवसा मिळाली तर आत्महत्येचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022Nana Patekarनाना पाटेकरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस