शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये लंडनसारखं वातावरण, काहीजण...; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 15:47 IST

कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण खोटेनाटे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करू नका असं आवाहन एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केले. 

नागपूर - विदर्भात नागपूर अधिवेशनात आपण कशाला आलोय, जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रत्येकाने गांभीर्याने घेतले पाहिजे. सरकार आहे परंतु विरोधी पक्षाचे आमदारही त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे असा संदेश लोकांपर्यंत पोहचला पाहिजे  नागपूरमध्ये लंडनसारखं वातवरण आहे. काही जण आनंद, पर्यटन करून निघून जातात. त्यांना लोकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे राहिले नाही असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता खोचक टोला लगावला.

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, परभणी, बीड, कल्याण असो हे राज्य कायद्याचे आहे. इथं न्याय होणारच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर उत्तर विधानसभेत दिले. गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. मी मविआ सरकारमध्ये मंत्री होतो. मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव सुरू होता. मविआचा कारभार कसा चालत होता हे अंबादास यांना कल्पना आहे पण त्यांना बोलता येत नाही. सध्या अंबादास तुम लढो मै खोके लेके घर जाता हूँ असा कारभार आहे. विधानसभेत मिळालेलं यश हे अनपेक्षित, आम्हालाही वाटलं नव्हते. ईव्हीएम घोटाळा नाही तर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. विरोधकांनी खोटेनाटे आरोप न करता जनतेचे प्रश्न सभागृहात मांडाल ही अपेक्षा होती. सभागृहात कमी परंतु माध्यमांसमोर बोलण्यात विरोधकांनी धन्यता मांडली. आरोपाला आरोपाने नव्हे कामातून उत्तर देऊ. निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झाले घरी जनतेला काम करणारे लोक आवडतात. घरी बसणाऱ्यांना घरी बसवतात असं त्यांनी म्हटलं. 

तसेच प्रकल्पांना विलंब झाला हे कुणामुळे याचा विचार विरोधकांनी करावा. विकासकामांना स्पीड ब्रेकर लावणारे, योजना बंद पाडणारे कोण याचेही उत्तर शोधावे. आम्ही गेल्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना दिली. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड सुरू झाले. २० योजनांना आम्ही चालना दिली त्याची पोचपावती जनतेने दिली. इतक्या वेगाने निर्णय, कल्याणकारी योजना आम्ही आणल्या. ५-१० वर्षाचं काम आम्ही अडीच वर्षात करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीचे गृहमंत्री होते, वसुली प्रकरणात त्यांना जेलमध्ये जावे लागले. उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवण्यात आले. पालघर साधुची हत्या झाली. बॉम्बस्फोटातील आरोपीच्या कबरीचं उदात्तीकरण करण्यात आले. मविआ काळात पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला गेला. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. प्रवीण दरेकरांनी दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. फडणवीस आणि मला अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळच्या सरकारच्या प्रमुखांनी कसा गैरवापर केला. कारस्थाने केली हे मला वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का...? असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना विचारला. 

दरम्यान, महाराष्ट्रात ज्यानं माज केला तो उतरवलाच पाहिजे हे काम सरकार करेल. चुकीला माफी नाही. या राज्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आयाबहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला माफी नाही, कुणालाही सोडणार नाही हे सरकारचं धोरण आहे. स्वार्थी राजकारणासाठी समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं काम कुणी करू नये. सत्ताधारी-विरोधी पक्ष लोकशाहीची चाके आहेत. राज्यात सर्वधर्मीय, सर्व समाज राहतात त्यांच्यात तेढ निर्माण करू नका हे माझं आवाहन आहे. मविआ काळात औद्योगिक गुंतवणुकीत तिसऱ्या नंबरवर होता. आमच्या काळात पुन्हा महाराष्ट्रात नंबर वन आला आहे. देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के महाराष्ट्रात आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातून उद्योग पळाले असं फेक नेरिटिव्ह विरोधकांनी पसरवलं. मी पुराव्यानिशी बोलेन. जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका उद्योग खात्याने काढली. श्वेतपत्रिका काढायला हिंमत लागते. एक महामार्ग इको सिस्टिम तयार करतो. समृद्धी महामार्गामुळे आसपासच्या भागात कंपन्या उभ्या राहतायेत. चांगल्याला चांगले म्हणण्याची वृत्ती असली पाहिजे. कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण खोटेनाटे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करू नका असं आवाहन एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahavikas Aghadiमहाविकास आघाडी