शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

नागपूरची ओळख बनणार ‘तिरंगा’!

By admin | Updated: October 29, 2016 02:17 IST

लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क येथे २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. ही नागपूरसाठी अभिमानास्पद बाब

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क येथे २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. ही नागपूरसाठी अभिमानास्पद बाब आहे. युवकांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागविण्यासाठी हा तिरंगा प्रेरणादायी ठरेल. हा राष्ट्रध्वज येत्या काळात नागपूरच्या इतिहासातील अभिमानास्पद ओळख बनेल, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.या प्रकल्पाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. विशेष अतिथी म्हणून लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. या वेळी आ. सुधाकरराव देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, परिवहन समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण पाटणकर, ११८ इन्फॅन्ट्री बटालियनचे सुभेदार वीरेंद्र सिंग, माजी आ. यादवराव देवगडे, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, सभापती सुनील अग्रवाल, गोपाल बोहरे, वर्षा ठाकरे, नगरसेवक प्रकाश तोतवानी, सुजाता कोंबाडे, प्रगती पाटील, गौतम पाटील, सारिका नांदूरकर, जयश्री वाडिभस्मे, सीमा राऊत, स्वाती आखतकर, रिता मुळे, रश्मी फडणवीस, माजी नगरसेवक मनोज साबळे, विठ्ठलराव कोंबाडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, पेंच प्रकल्प सेलचे प्रकल्प अभियंता संदीप लोखंडे, उपविभागीय अभियंता धनंजय मेंडुलकर, प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार आर. जगताप, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमत वृत्तपत्र समूहाचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग उपस्थित होते. वास्तुविशारद शांतनु भल्ला, जे.सी. भल्ला, कपिल भल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला जात असून तो सहा महिन्यांत पूर्णत्वास येईल, असा विश्वास लोकमत व महापालिकेने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागविणार - विजय दर्डा धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर देशाची कर्मभूमी, मर्मभूमी व हृदयस्थळ झीरो माईल असलेल्या नागपूर शहरातील कस्तुरचंद पार्कवर राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे, त्यांना तिरंग्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने हा प्रकल्प उभारला जात आहे, असे लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी सांगितले. संसदेतही तिरंगा बॅच लावून प्रवेश मिळावा, यासाठी आपण गेली १८ वर्षे आग्रह धरला; शेवटी त्यात यश मिळाले. आपण विजय मिळवितो तेव्हा तिरंग्याच्या साक्षीने जल्लोष करतो. हा तिरंगा विजयाचेही प्रतीक ठरेल. येत्या काळात हे एक प्रेक्षणीय स्थळदेखील होईल, असेही दर्डा यांनी सांगितले.२००९ पासून सुरू होता संघर्षलोकमत वृत्तपत्र समूहाला राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यासाठी २००९पासून सतत संघर्ष करावा लागला. या दरम्यान सरकारही बदलले. अधिकारी बदलले. मात्र, लोकमत वृत्तपत्र समूह आपल्या ध्येयावर कायम राहिले. विजय दर्डा यांनी यासाठी सातत्याने संघर्ष केला. खासदार असताना दर्डा यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विमानतळ प्राधिकरण, महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व अन्य संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय उत्सवात लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यासाठी त्यांनी तत्कालीनकेंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, विधान परिषदेचे नेते, विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनाही पत्र लिहिले. त्यांनी मुंबईतील चौपाटीवर २०७ फूट उंच तिरंगा झेंडा लावण्याबाबत प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चाही केली.नागपुरात उंच राष्ट्रध्वज लावण्याकरिता हेरिटेज कमिटीची मंजुरी मिळण्यासाठीही त्यांनी पत्रव्यवहार केला. या सर्व संघर्षानंतर २८ जुलै २०१६ रोजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत लोकमत वृत्तपत्र समूह व नागपूर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रध्वजासह २०० फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्याच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.लोकमतने सामाजिक बांधिलकी जपली - गडकरीलोकमत वृत्तपत्र समूहातर्फे समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम राबविले जातात. देशसेवेच्या प्रत्येक उपक्रमात लोकमतचा पुढाकार असतो. मोवाड पूर, लातूर भूकंप, कारगिलचे युद्ध आदी प्रसंगी लोकमतने मदतीसाठी घेतलेला पुढाकार सर्वांनीच अनुभवला आहे.पुन्हा एकदा या राष्ट्रध्वज प्रकल्पाच्या माध्यमातून लोकमतने आपली समाज व देशाप्रति असलेली बांधिलकी स्पष्ट केली आहे, अशी प्रशंसा गडकरी यांनी ‘लोकमत’ची केली.