शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:22 IST

शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास गुरुवार, ५ जूनपासून करणे आता शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जूनला समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचे इगतपुरी येथील सोहळ्यात लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने ७०१ किलोमीटर लांबीच्या प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील ६२५ किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला झाला आहे. आता गुरुवारपासून शेवटच्या टप्प्यातील महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर आठ तासांत पोहोचता येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते.

पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही....

  • 'एमएसआरडीसी'ने या महामार्गाच्या लोकार्पणासाठी एप्रिलमध्ये राज्य सरकारकडे वेळ मागितली होती. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता.
  • तेव्हाच्या नियोजनानुसार शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी प्रवासासाठी खुला केला जाणार होता. त्यादृष्टीने 'एमएसआरडीसी'ने हालचालीही सुरू केल्या होत्या.
  • मात्र, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे या मार्गाचे उद्घाटन लांबणीवर पडले.

महामार्गाचे आतापर्यंतचे टप्पे

  • समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला झाला होता. तर, दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर, असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
  • तर, गेल्यावर्षी वर्षी तिसऱ्या टप्प्यात 'एमएसआरडीसी'ने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किलोमीटरचा मार्ग सुरू केला. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत.
  • या बोगद्यांच्या भागात रेखाटली चित्रे
  • इगतपुरी ते आमने या ७६ किलोमीटरच्या डोंगराळ भागात 'समृद्धी'वर पाच बोगदे आहेत. त्यांची एकत्रित लांबी ११ किमी असून, त्यात इगतपुरी येथील ७.७८ किमीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदाही आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आता आठ मिनिटांमध्ये पार करता येईल.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरMumbaiमुंबई