शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:22 IST

शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास गुरुवार, ५ जूनपासून करणे आता शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जूनला समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचे इगतपुरी येथील सोहळ्यात लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने ७०१ किलोमीटर लांबीच्या प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील ६२५ किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला झाला आहे. आता गुरुवारपासून शेवटच्या टप्प्यातील महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर आठ तासांत पोहोचता येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते.

पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही....

  • 'एमएसआरडीसी'ने या महामार्गाच्या लोकार्पणासाठी एप्रिलमध्ये राज्य सरकारकडे वेळ मागितली होती. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता.
  • तेव्हाच्या नियोजनानुसार शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी प्रवासासाठी खुला केला जाणार होता. त्यादृष्टीने 'एमएसआरडीसी'ने हालचालीही सुरू केल्या होत्या.
  • मात्र, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे या मार्गाचे उद्घाटन लांबणीवर पडले.

महामार्गाचे आतापर्यंतचे टप्पे

  • समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला झाला होता. तर, दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर, असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
  • तर, गेल्यावर्षी वर्षी तिसऱ्या टप्प्यात 'एमएसआरडीसी'ने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किलोमीटरचा मार्ग सुरू केला. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत.
  • या बोगद्यांच्या भागात रेखाटली चित्रे
  • इगतपुरी ते आमने या ७६ किलोमीटरच्या डोंगराळ भागात 'समृद्धी'वर पाच बोगदे आहेत. त्यांची एकत्रित लांबी ११ किमी असून, त्यात इगतपुरी येथील ७.७८ किमीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदाही आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आता आठ मिनिटांमध्ये पार करता येईल.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरMumbaiमुंबई