अमरावतीच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ कायम!
By Admin | Updated: March 30, 2015 02:06 IST2015-03-30T02:06:40+5:302015-03-30T02:06:40+5:30
तिहेरी हत्याकांडात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मृत शिल्पाचे नातेवाईक संजय ढाणके यांनी केला आहे. त्यांनी

अमरावतीच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ कायम!
अमरावती : तिहेरी हत्याकांडात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मृत शिल्पाचे नातेवाईक संजय ढाणके यांनी केला आहे. त्यांनी भाजपाचे कल्याण येथील आमदार नरेंद्र पवार यांना निवेदन देऊन त्यांच्या माध्यमातून मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौड यांच्याकडे न्यायासाठी साकडे घातले आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे गृहमंत्र्यांनी मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुलताई पोलीस ठाण्यांतर्गत काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड घडल्यावर पोलिसांनी प्रवीण मनवरला अटक केली. प्रवीणची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. मात्र, हत्येचे गूढ कायम असतानाही प्रवीणची पुन्हा पोलीस कोठडी घेण्यात आली नाही, असा आरोप ढाणके यांनी केला आहे. पोलिसांच्या कारवाईत दिरंगाई होत असून, प्रवीणला पाठिशी घालण्याचा प्रयत्न मुलताई पोलीस करीत आहेत, असा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. आमदार पवार यांनी तत्काळ मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करुन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यांनीही तिहेरी हत्याकांडाची सर्व कागदपत्रे पाठविण्यास सांगितले असून, मदतीचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)