शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

भाजपात आलो ही माझी अडचण, कारण..; देवेंद्र फडणवीसांसमोरच नारायण राणे असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:58 IST

शिवसेना बाळासाहेबांनंतर टक्केवारी सेना झाली. मुंबई महापालिका २५ वर्ष लुटली असा आरोप नारायण राणेंनी केला.

रत्नागिरी - माझी राजकीय वाटचाल शिवसेनेतून सुरू झाली. त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपा. हा शेवटचा पक्ष आहे. आत्ता नंतर कुठला पक्ष नाही. मी ज्या पक्षात असतो तिथे १०० टक्के असतो. कुणी कितीही ऑफर दिली तरी दगाफटका होणार नाही. ऑफर देणाऱ्याला दगा होईल किंवा फटका होईल पण माझ्याकडून होणार नाही असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. 

नारायण राणे म्हणाले की, चांगल्याला चांगले म्हणणं ही माणुसकी आहे. रवींद्र चव्हाण प्रामाणिकपणे काम करतायेत. फक्त १ सांगेन, लोकप्रतिनिधींची गर्दी ही ६ महिन्यांची नाही तर ३३ वर्षाची आहे. मी जे काही दिले त्याच वेळी दिले. मला पण फटाके काढता येतात. मी काढेन तेव्हा पळताभुई थोडी होईल. या जिल्ह्यातही राहता येणार नाही. मी सहन करतोय. कारण भाजपात मी आलोय ही माझी अडचण आहे. भाजपात असल्यानं सहनशीलता बाळगावी लागते. विचारसरणीचे लोक आहेत. आपण त्यातच बसतो मग तसे व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत काहींना रात्री दिसत नाही दिवसा दिसते. पत्रकार त्यांना बाईट देऊन प्रश्न विचारतात. नाणारच्या गावात किती जागा घेऊन ठेवल्या. कुठल्या प्रकल्पाठिकाणी आमची जागा आहे. शिवसेना बाळासाहेबांनंतर टक्केवारी सेना झाली. मुंबई महापालिका २५ वर्ष लुटली. देश-परदेशात गुंतवणूक केली. कोकणी माणसाने शिवसेनेची सत्ता मुंबईत आणली. परंतु कोकणाकडे आणि कोकणी माणसाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?अंगणेवाडीतील सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याठिकाणाहून भाजपाचा खासदार, आमदार असेल. कोकणातील चिपी विमानतळाचे श्रेय नारायण राणेंना द्यावे लागेल. कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी काही केले नाही. नारायण राणेंनी काय केले हे सर्वांना माहिती आहे. याठिकाणी रस्ते, वाहतुकीची व्यवस्था, मुलभूत सुविधा हे नारायण राणेंनी आणले असं सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना