शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यांमध्ये स्ट्राँग, त्यांना यश मिळणं अशक्य - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:02 IST

महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत राहिली नाही, त्यांच्या लोकसभेच्या तीन चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे : आठवले

गुरुवारी देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता अन्य चारही राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारली. तर शिवसेनेनं उभ्या केलेल्या उमेदवारांना यश मिळालं नाही. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला असून आपला पक्ष इतर राज्यांमध्ये शिवसेनेपेक्षा अधिक बळकट असल्याचं म्हटलं आहे.

"महाराष्ट्रातशिवसेना भाजप सोबत राहिली नाही, त्यांच्या लोकसभेच्या तीन चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे," अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "शिवसेनेला बाहेरच्या राज्यात यश मिळण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्यापेक्षा माझा पक्ष हा इतर राज्यांमध्ये बळकट आहे. मणिपुरमध्ये आमचा उमेदवार केवळ १८३ मतांनी पराभूत झाला. शिवसेनेला बाहेरील राज्यात यश मिळणं अशक्य आहे," असंही ते म्हणाले.

"महाराष्ट्रातशिवसेना भाजपसोबत राहीली नाही, तर लोकसभेच्या तीन-चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे. तर विधानसभेलाही त्यांचं पानीपत होईल. महाविकास आघाडीचे तीन पक्ष परस्परांविरोधात उभे राहणारे पक्ष आहेत. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आणि अन्य महापालिका निवडणुकांमध्येही प्रचंड यश आम्हाला मिळेल. आगामी लोकसभेत विधानसभेतही आम्हाला चांगल्या जागा मिळतील. विधानसभेतही आमचं सरकार येणार याचा आम्हाला विश्वास आहे आणि महाविकास आघाडीला प्रचंड नुकसान होईल," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRamdas Athawaleरामदास आठवलेMaharashtraमहाराष्ट्र