शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यांमध्ये स्ट्राँग, त्यांना यश मिळणं अशक्य - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:02 IST

महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत राहिली नाही, त्यांच्या लोकसभेच्या तीन चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे : आठवले

गुरुवारी देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता अन्य चारही राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारली. तर शिवसेनेनं उभ्या केलेल्या उमेदवारांना यश मिळालं नाही. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला असून आपला पक्ष इतर राज्यांमध्ये शिवसेनेपेक्षा अधिक बळकट असल्याचं म्हटलं आहे.

"महाराष्ट्रातशिवसेना भाजप सोबत राहिली नाही, त्यांच्या लोकसभेच्या तीन चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे," अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "शिवसेनेला बाहेरच्या राज्यात यश मिळण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्यापेक्षा माझा पक्ष हा इतर राज्यांमध्ये बळकट आहे. मणिपुरमध्ये आमचा उमेदवार केवळ १८३ मतांनी पराभूत झाला. शिवसेनेला बाहेरील राज्यात यश मिळणं अशक्य आहे," असंही ते म्हणाले.

"महाराष्ट्रातशिवसेना भाजपसोबत राहीली नाही, तर लोकसभेच्या तीन-चार जागाही निवडून येतील का नाही ही शंका आहे. तर विधानसभेलाही त्यांचं पानीपत होईल. महाविकास आघाडीचे तीन पक्ष परस्परांविरोधात उभे राहणारे पक्ष आहेत. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आणि अन्य महापालिका निवडणुकांमध्येही प्रचंड यश आम्हाला मिळेल. आगामी लोकसभेत विधानसभेतही आम्हाला चांगल्या जागा मिळतील. विधानसभेतही आमचं सरकार येणार याचा आम्हाला विश्वास आहे आणि महाविकास आघाडीला प्रचंड नुकसान होईल," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRamdas Athawaleरामदास आठवलेMaharashtraमहाराष्ट्र