शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, आतापर्यंत जनजागृती ७६ लाखांची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 05:17 IST

CoronaVirus News : जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता.

मुंबई : कोविड काळात १५ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत मुंबईत जनजागृती करण्यात आली. या अभियानाकरिता प्रसारभारतीसह इतर खासगी रेडिओ वाहिन्यांवरून जिंगल्स स्वरूपात संदेश देण्यात आला होता. या मोहिमेसाठी ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत मुंबईत आरोग्य विभाग व स्वयंसेवकांचे पथक घरोघरी जाऊन लोकांची तपासणी व जनजागृती करीत होते. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत मुंबईकरांना जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक होते. यासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर, वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा स्वीकार करण्यास सामान्य जनमानसात व्यापक स्वरूपात जनजागृती होणे आवश्यक होते. यासाठी ही मोहीम १५ सप्टेंबरपासून राबवण्यात आली.

आरोग्यविषयक शिक्षण देणे हे मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्यविषयक शिक्षण देणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे जिंगल्स संदेश २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत प्रसारित करण्यासाठी एकूण ३३ लाख ५१ हजार रुपये एवढे खर्च करण्यात आले, तर १५ ते २४ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत याच खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे ४३ लाख ३३ हजार रुपये याप्रमाणे ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस