शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

नशामुक्तीसाठी माझा बुलडोझर - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 06:06 IST

अनधिकृत पब्ज, हॉटेल्स थेट पाडून टाकण्याचे आदेश आम्ही दिल्याने राज्यातील अनेक अनधिकृत बांधकामे बुलडोझरने तोडली गेली आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी शपथ घेतली. महायुती सरकार सत्तेवर आले. आमच्यासमोर अनेक आव्हाने होती. पूर्वीच्या सरकारच्या मर्यादांमुळे या आव्हानांवर मार्ग काढणे गरजेचे होते. आज तरुणांची पिढी मादक द्रव्यांच्या आहारी जाऊ नये, यासाठी काही निर्णय धडाक्याने घेणे आवश्यक होते. ते आम्ही घेतले आहेत आणि ‘ड्रग्ज फ्री’ महाराष्ट्राकडे आपली आश्वासक वाटचाल सुरू आहे.   

का गोष्टीमुळे मी खूप अस्वस्थ होतोय, ते म्हणजे अमली पदार्थांचा वापर करणाऱ्या तरुण-तरुणींची वाढती संख्या. ड्रग्जचा राक्षस वेळीच रोखला नाही, तर तो फार मोठ्या संकटात टाकू शकतो याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे; पण याचा मुकाबला खूप नियोजनबद्धपणे करावा लागणार आहे. यावर मी गेल्या वर्षी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत काही बैठका घेऊन सविस्तर चर्चाही केली आहे. 

काही दिवसांपूर्वीपासून आम्ही ड्रग्जविरोधात धडाक्याने मोहीम हाती घेतली आहे, ते सर्वांसमोरच आहे. अनधिकृत पब्ज, हॉटेल्स थेट पाडून टाकण्याचे आदेश आम्ही दिल्याने राज्यातील अनेक अनधिकृत बांधकामे बुलडोझरने तोडली गेली आहेत. ड्रग्जपुरवठा करण्यावर यामुळे निश्चितच आळा बसणार आहे. 

मुळात किशोरवयीन मुले अज्ञानाअभावी ड्रग्जच्या चिखलात अडकली आहेत, यात काही शंकाच नाही. त्यांच्या आरोग्यावर आणि करिअरवर याचा खोलवर परिणाम होत आहे. एकीकडे त्यांचे हे व्यसन सुटावे म्हणून प्रयत्न करीत आहोत आणि दुसरीकडे याचा व्यापार उद्ध्वस्त करणे अशा दोन आघाड्यांवर लढावे लागणार आहे. यापासून कायमची मुक्ती मिळवायची असेल, तर जाणीवपूर्वक विविध आघाड्यांवर काम करावे लागेल हे माझ्या लक्षात आले.  किशोरवयीन मुलांमधील अमली पदार्थांचे व्यसन आणि तस्करी रोखणे हा यातला महत्त्वाचा भाग आहे. आज जगभरात अमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू आहे. त्यातून लोकांना दारूमुळे होणाऱ्या हानीची जाणीव होते. ड्रग्ज आणि अवैध तस्करी रोखण्यासाठी भारतातही कडक कायदे आहेत. मात्र, लोकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही.

गेल्या वर्षीच मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले. अमली पदार्थ विभागाने ड्रग्जमाफियांवर काय कारवाई केली तेही मी पाहिले. पुणे, पिंपरी चिंचवडसह सर्वत्रच  राज्य 

उत्पादन शुल्कची भरारी पथके फिरताहेत. त्यांची विशेष तपासणी मोहीम काटेकोरपणे राबविणे सुरू आहे. कारवाईबाबत बोलायचे तर एप्रिलअखेर ६,७६१ गुन्हे दाखल झाले आहेत आणि  अमली पदार्थ सेवन करणाऱ्या ५,७४५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. १,०१६ ठिकाणी सुमारे ४ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

संपूर्ण शहरात ड्रग्जशी संबंधित अनेक गुन्हे दाखल झाले आणि मुंबई पोलिसांनी तर वर्षभरात ४,८०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे अमली पदार्थ नष्टही केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नालासोपारा आणि गुजरात येथील एमडी या अमली पदार्थाची निर्मिती करणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कवठेमहांकाळ तालुक्यात एमडी उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून १५० कोटींहून अधिक किमतीचा एमडी अमली पदार्थ जप्त केला. गेल्या महिन्यात नवी मुंबईत पोलिसांच्या कारवाईत तब्बल ३६ लाख २० हजारांचे विविध अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही निश्चितच चांगली कारवाई झाली; पण आपल्याला थांबून चालणार नाही. बेकायदा अमली पदार्थांच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिस विभागाला मी कायम सतर्क राहण्यास सांगितले आहे. मुंबईतील सुमारे ७ हजार  शिक्षकांना जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. हे प्रयत्न निश्चितपणे प्रभावी ठरतील, असे मला वाटते. 

विविध प्रकारचे अमली पदार्थ मिळणे सोपे होत आहे, हे चिंताजनक आहे. पानटपऱ्या, हॉकर्स, रेल्वे स्थानकांवरील हॉकर्स हे यांचे प्रमुख विक्रेते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावरही लक्ष केंद्रित केले.  मुंबई पोलिस, मुंबई महापालिका  यांच्या वतीने अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयाजवळील पानटपऱ्यांवर कारवाई करून त्या हटविण्यात आल्या आहेत. कोटपा कायद्यांतर्गत ई सिगारेटस् प्रकरणी कारवाई करण्यात आली.  पदपथावरील हॉकर्स आणि रेल्वे स्थानकांवरील हॉकर्सविरुद्धदेखील मोहीम उघडली. या मोहिमा न थांबवता शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई करून व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम घेण्यास मी सांगितले आहे. 

अमली पदार्थ निर्मितीचे कारखाने उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. अमली पदार्थांचा पुरवठा रोखला पाहिजे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्यात येत आहे. अमली पदार्थमुक्त मुंबई करतानाच राज्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे पेव फुटले आहे का? याबाबत दक्ष राहून कारवाई करण्यात येत आहे.  जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क हे विभाग आता पुढे सरसावले आहेत.

ड्रग्ज फ्री होण्यासाठी नागरिक म्हणून आपणसुद्धा चौकस राहिले पाहिजे. आजूबाजूला आपल्या वसाहतीत, कॉलनीत, परिसरात यासंदर्भात जागरूक राहून काही संशयास्पद वाटले किंवा अचानक काही मुले व्यसन करताना आढळून आली तर पोलिसांना  सांगितले पाहिजे. ही एक लोकचळवळ व्हावी, अशी माझी इच्छा आहे; पण, केवळ सरकार किंवा पोलिस यात सर्वकाही करतील असे होऊ नये. जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका महत्त्वाची आहे. अमली पदार्थविरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप दिले तर ती खूप परिणामकारक होईल, याची मला खात्री आहे. राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला अधिक मजबूत करणे आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.  राज्य शासन यात पुढाकार घेईल आणि एखादी परिणामकारक, नावीन्यपूर्ण योजना यासाठी आणली जाईल. या दृष्टीने नजीकच्या काळात निश्चितपणे पावले उचलली जातील.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDrugsअमली पदार्थMaharashtraमहाराष्ट्र