- तेजस टवलारकरसंत तुकोबाराय वारी करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शेकडो वारकरी जात होते. वाटेत एकदा असाच पाऊस आला. काय करावे कळत नव्हते. शेजारीच मशीद होती. मुस्लीम बांधवानी ती मशिद खुली करून वारकऱ्यांना आश्रय दिला. वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण केले. त्यावेळी जगदगुरू संत तुकोबारायांनी रात्री किर्तन केले. त्यात अल्ला देवे अल्ला दिलावे, असा अभंग जागेवर रचला. त्या दिवसापासून वारी सर्व समाजाची झाली. सर्वसमावेशक झाली. तुकोबांपासून घट झालेली एकोप्याची वीण वर्षानुवर्षे, युगानयुगे कायम आहे. संत तुकोबाराय पालखी सोहळा यवत मुक्कमी आला. तेथे एकोप्याची वीण अधिक घट्ट झाल्याचा अनुभव आला. पालखीत वारकऱ्यांना सर्वधर्मीय दाते मिळतात. यवतलाहू मुस्लीम समाज जेवण देतो. आज यवत मुक्कामी सोहळा आला. मात्र एकदशी होती. लोकांचे उपवास होते. यवत गावकरी झुणका भाकर असे पारंपारिक जेवण करतात. मात्र यंदा भगर केली तीही सातशे किलो. मुस्लीम समाजही जेवण करतो. मात्र एकादशी आल्याने मुस्लीम समाजाने चक्क खिचडी केली, तीही शंभर किलो.
अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 10:10 IST