मुस्लीमबहुल गावात गोहत्या बंदी!
By Admin | Updated: July 11, 2014 00:31 IST2014-07-11T00:31:48+5:302014-07-11T00:31:48+5:30
शिरपूर खेट्रीवासीयांनी केला निर्धार; मुस्लीम नेत्याचाच पुढाकार

मुस्लीमबहुल गावात गोहत्या बंदी!
खेट्री: शिरपूर खेट्री.. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये १५00 लोकसंख्या असलेले एक लहानसे गाव. ९५ टक्के मुस्लीम धर्मियांची घरं असलेल्या या ग्रामवासीयांनी मुस्लीम नेत्याने दिलेल्या गोहत्या बंदीच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि हिंदू धर्मियांच्या गोमातेचे रक्त गावात सांडू न देण्याचा निर्धार केला. पोलिस दलाच्या दप्तरी संवेदनशील म्हणून नोंद असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुस्लीमबहूल गावाने गोहत्या बंदीसाठी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे.
शिरपूर खेट्री हे गाव मुस्लीमबहुल असल्याने, या गावातील नेते सार्वजनिक जीवनात वावरताना गोहत्येच्या मुद्यावरून त्यांना नेहमी हिनवले जायचे.
तुमच्या गावात गायींची हत्या मोठय़ा प्रमाणात केली जाते, अशी टीका त्यांच्यावर व्हायची. यातून गावाची बदनामीही व्हायची. त्यामुळे भाजपचे पातूर तालुक्यातील अल्पसंख्याक आघाडीचे माजी अध्यक्ष आसिफ खाँ इनायत खाँ यांनी गावातील नेत्यांना एकत्र केले. गोहत्येमुळे लोकांचा गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, त्यामुळे गावकरी तसेच गावातील मांस विक्रीचा व्यवसाय करणारे यापुढे गोहत्या करणार नाही, गायीचे मांस खाणार नाही, गायीची विक्री करणार नाही आणि कुणालाही करू दिली जाणार नाही, असा निर्धार त्यांनी ग्रामस्थांकडून करून घेतला. जवळपास वर्ष झाले, गावकरी या निर्धारावर ठाम आहेत.
त्यामुळे एकेकाळी गोहत्येसाठी जिलत कुप्रसिद्ध असलेल्या खेट्री गावावरील कलंक दूर होण्यास मदत झाली.
** ह्यपाच मिनिट का मदरसाह्णतून मिळाली प्रेरणा
मुस्लीम धर्मियांमध्ये शरियत कायद्याला महत्त्व आहे. शरियतनुसार गोहत्या करणे पाप मानले जाते. इस्लामिक कायद्याचे पालन करून घेणारे उलेमा, मुफ्ती यांनी लिहिलेल्या ह्यपाच मिनिट का मदरसाह्ण या पुस्तकात गायीचे मांस खाणे आरोग्यास घातक आणि दुध, तूप खाणे फायदेशीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यातून प्रेरणा घेत आसीफ खाँ आणि गावातील मुस्लीम धर्मियांनी गोहत्या बंदी करण्याचा निर्णय घेतला.
** गावात २५0 गायी
गावातील कुटुंब्ीायांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे पशुधन हे या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचे आहे. गावात २५0 पेक्षा जास्त गायी आहेत. येथील सरपंचसुद्धा गोहत्या बंदीच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करतात.