शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-ठाण्यासह राज्यभर कोसळधार

By admin | Updated: August 1, 2016 04:54 IST

मुंबई महानगर प्रदेशात रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार वृष्टीने ठाणे व रायगड जिल्ह्याला झोडपून काढले.

मुंबई/ठाणे/रायगड : मुंबई महानगर प्रदेशात रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार वृष्टीने ठाणे व रायगड जिल्ह्याला झोडपून काढले. शहापूर तालुक्यात धबधब्याच्या पाण्यात बुडून गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. तर १२ पर्यटकांसह परीक्षेसाठी आलेले ६० विद्यार्थी असे ७२ जण भिन्न ठिकाणी पाण्यात अडकले. पारसिक बोगद्याजवळ रुळांवर पाणी साठल्याने सकाळी काही काळ मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक बंद पडल्याने २२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. नंतर दिवसभर पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा अर्धा तास उशिराने धावत होती.रविवारी ठाणे व रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असताना मुंबईत तुलनेत पावसाचा तडाखा कमी होता. त्यामुळे मुंबईकरांनी मरिन ड्राइव्ह, वरळी सी-फेस आदी समुद्रकिनारी गर्दी करत पावसाचा आनंद लुटला. रविवार सकाळपासून सायंकाळपर्यंत मुंबई शहरात १५.२१ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ७४.९० मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात ६३.५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उपनगरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, दहिसर, वांद्रे, बोरीवली आणि मालाडमध्ये पाणी साचले होते. पवई येथील इंदिरा नगरलगतची दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. दिवसभरात १७ ठिकाणी झाडे पडल्याचे व पाच ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>ठाण्यात धो धो कोसळला; शहर परिसरात १७९ मिमी पाऊसठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण या शहरांत सर्वाधिक पाऊस झाला असला तरी त्यासोबतच डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, भार्इंदर-मीरा रोड या शहरांना आणि मुरबाड-शहापूर तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. मात्र, रविवारचा सुटीचा दिवस असल्याने रेल्वे स्थानकांत-रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ठाणे शहर परिसरात १७९ मिमी इतका झाला. या मुसळधार पावसामुळे ठाणे व मुंब्रा परिसरातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने दुपारी तास-दीड तास कल्याण ते ठाणेदरम्यानची उपनगरी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.७२ जण अडकलेठाणे शहरात भिंत कोसळण्यासह पाच ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. मानपाडा, पातलीपाडा, कोपरी बसस्थानक, दत्तवाडी, हिरानंदानी इस्टेट, वंदना चित्रपटगृह, मुंब्रादेवी कॉलनी आणि आलिशान टॉकीज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. घोडबंदर परिसरात पिकनिकसाठी आलेले १२ पर्यटक अडकले, तर शाळेत परीक्षेसाठी आलेली ६० मुले असे ७२ जण साचलेल्या पाण्यामुळे अडकून पडले होते. मात्र, त्यांची सुखरूप सुटका झाली. धरणे भरू लागलीपावसाने धरणांतही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. भातसा धरणात ७५ टक्के, तर बारवी धरणात ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. उल्हास नदीत पाणी सोडून विविध महापालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या आंध्रा धरणात ३१.४९ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ७३.७६ टक्के, तर तानसात ७८.८३ टक्के पाणीसाठा आहे.>गिर्यारोहकाचा मृत्यूशहापूर : माहुली गडावर धबधब्यातून रॅपलिंग करण्यासाठी दोर बांधत असताना पाय घसरून विक्र ांत विजय जगताप (२८) या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. गिर्यारोहणासाठी रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कल्याणचे पाच तरुण माहुली गडावर आले होते. नाश्ता आटोपून त्यांनी सकाळी साडेनऊच्या दरम्यान रॅपलिंगसाठी दोर बांधण्यास सुरुवात केली, तेव्हा पाय घसरून विक्र ांत जगताप धबधब्यातून थेट कुंडात कोसळला. धबधब्यातील पाण्याचा जोर अधिक होता. त्याला वाचविण्याचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केला; पण त्याचा उपयोग झाला नाही, असे त्याच्यासोबत आलेल्या अजिंक्य वाघमारे यांनी शहापूर पोलिसांना सांगितले.