शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबई, ठाणे उद्धव ठाकरेंना मतदान करण्यास आतुर - ॲड. हर्षल प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:08 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख ॲड. हर्षल प्रधान यांनी ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

हर्षल प्रधान

महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक भावनिक आत्मीयता आहे. कोरोनारूपी संकटात महाराष्ट्रातील सामान्यातील सामान्य माणसाला त्याची जात-पात-धर्म-पंथ- भाषा काहीही न पाहता आपला माणूस म्हणून त्याला वाचवण्याची सांभाळण्याची आणि त्याला सुखरूप ठेवण्याची हिमालयाएवढी जबाबदारी अतिशय निकराने मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी पार पाडली. त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर एकीकडे राजकीय चक्रव्यूहात अडकवून सत्ताबाह्य होण्याची वेळ आली तर दुसरीकडे शारीरिक शस्त्रक्रियेसही सामोरे जावे लागले. या सर्व संकटावर मात करत ते पुन्हा उभे राहिले.

स्वतःच्या वडिलांनी कष्टाने वाढवलेला पक्ष आणि त्यांच्या पश्चात अतिशय जिद्दीने आणि स्वाभिमानाने वाढवत उद्धव ठाकरे यांनी स्वतःची एक आश्वासक नेता म्हणून प्रतिमा निर्माण केली. तीच प्रतिमा मोडून काढण्याचा डाव भाजपने टाकला आणि महाराष्ट्र आणि केंद्रातील काही भाजप नेत्यांनाही त्या 'प्रतिमाभंजन नाट्यप्रयोगा'चा एक भाग व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी मुंबई आणि ठाण्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांनी बाळासाहेबांवर निरतिशय प्रेम केलं आणि बाळासाहेब ठाकरे यांनीही या दोन शहरांना कायम आपल्या सर्वोच्च आदरस्थानी ठेवले.

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यासोबत केवळ बंड केले नाही तर ज्या आनंद दिघे यांचा ते जप करतात त्या आनंद मुंबई, ठाणे येथील ९ मतदारसंघात मतदारसंघात मोठ्या उत्साहाने मतदान होईल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शाखाभेटींना उसळलेली गर्दी आणि मतदारांचा उदंड प्रतिसाद याचे द्योतक होता. मतदार उमेदवार कोण आहेत हे पाहणारच नाहीत तर उद्धव ठाकरे यांच्यासारख्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार करायला लावणाऱ्या सत्तालोभी भाजपला आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मतदार भरघोस मतदान करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

दिघे यांच्या निष्ठावान कारकीर्दीसोबतही बंड केले आहे. आनंद दिघे यांनी बाळासाहेबांकडे स्वतःसाठी काहीच मागितले नाही. दिवसरात्र ते बाळासाहेब आणि शिवसेनेसाठी झटत राहिले. शिंदे यांनी नेमके याच्या उलट केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला स्वतःच्या नावावर करणे, आनंद दिघे यांच्या निष्ठावान कारकीर्दीला डाग लावणे, भाजपच्या काही नेत्यांच्या हातातले बाहुले होणे व त्यांच्या समोर माना डोलावण्यासाठी भाजपचा पट्टा गळ्यात घालणे हे सामान्य शिवसैनिकांना रुचलेले नाही. सतीश प्रधान, आनंद दिघे, मो. दा. जोशी असे अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांनी ठाण्यात घडवले. मात्र कधी आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही आणि कोणाला ठेवू दिला नाही, त्यामुळे ठाणेकर या निवडणुकीत ज्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई