शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मुंबई, ठाणे उद्धव ठाकरेंना मतदान करण्यास आतुर - ॲड. हर्षल प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:08 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख ॲड. हर्षल प्रधान यांनी ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

हर्षल प्रधान

महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक भावनिक आत्मीयता आहे. कोरोनारूपी संकटात महाराष्ट्रातील सामान्यातील सामान्य माणसाला त्याची जात-पात-धर्म-पंथ- भाषा काहीही न पाहता आपला माणूस म्हणून त्याला वाचवण्याची सांभाळण्याची आणि त्याला सुखरूप ठेवण्याची हिमालयाएवढी जबाबदारी अतिशय निकराने मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी पार पाडली. त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर एकीकडे राजकीय चक्रव्यूहात अडकवून सत्ताबाह्य होण्याची वेळ आली तर दुसरीकडे शारीरिक शस्त्रक्रियेसही सामोरे जावे लागले. या सर्व संकटावर मात करत ते पुन्हा उभे राहिले.

स्वतःच्या वडिलांनी कष्टाने वाढवलेला पक्ष आणि त्यांच्या पश्चात अतिशय जिद्दीने आणि स्वाभिमानाने वाढवत उद्धव ठाकरे यांनी स्वतःची एक आश्वासक नेता म्हणून प्रतिमा निर्माण केली. तीच प्रतिमा मोडून काढण्याचा डाव भाजपने टाकला आणि महाराष्ट्र आणि केंद्रातील काही भाजप नेत्यांनाही त्या 'प्रतिमाभंजन नाट्यप्रयोगा'चा एक भाग व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी मुंबई आणि ठाण्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांनी बाळासाहेबांवर निरतिशय प्रेम केलं आणि बाळासाहेब ठाकरे यांनीही या दोन शहरांना कायम आपल्या सर्वोच्च आदरस्थानी ठेवले.

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यासोबत केवळ बंड केले नाही तर ज्या आनंद दिघे यांचा ते जप करतात त्या आनंद मुंबई, ठाणे येथील ९ मतदारसंघात मतदारसंघात मोठ्या उत्साहाने मतदान होईल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शाखाभेटींना उसळलेली गर्दी आणि मतदारांचा उदंड प्रतिसाद याचे द्योतक होता. मतदार उमेदवार कोण आहेत हे पाहणारच नाहीत तर उद्धव ठाकरे यांच्यासारख्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार करायला लावणाऱ्या सत्तालोभी भाजपला आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मतदार भरघोस मतदान करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

दिघे यांच्या निष्ठावान कारकीर्दीसोबतही बंड केले आहे. आनंद दिघे यांनी बाळासाहेबांकडे स्वतःसाठी काहीच मागितले नाही. दिवसरात्र ते बाळासाहेब आणि शिवसेनेसाठी झटत राहिले. शिंदे यांनी नेमके याच्या उलट केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला स्वतःच्या नावावर करणे, आनंद दिघे यांच्या निष्ठावान कारकीर्दीला डाग लावणे, भाजपच्या काही नेत्यांच्या हातातले बाहुले होणे व त्यांच्या समोर माना डोलावण्यासाठी भाजपचा पट्टा गळ्यात घालणे हे सामान्य शिवसैनिकांना रुचलेले नाही. सतीश प्रधान, आनंद दिघे, मो. दा. जोशी असे अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांनी ठाण्यात घडवले. मात्र कधी आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही आणि कोणाला ठेवू दिला नाही, त्यामुळे ठाणेकर या निवडणुकीत ज्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई