शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आहे ते सांभाळा; निघालेत स्मार्ट सिटी करायला: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 17:45 IST

सगळं व्यवस्थित काम करत आहे असं सांगितलं जातंय, प्रत्यक्षात तसे होत नाही.

मुंबई - गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, सत्ताधारी पक्षावर टीका करत आहे. मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे. तुंबलेली मुंबई महापौरांना दिसत नाही. जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत. असा टोला अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली आहे. शिवसेनेच्या हातात २० वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता आहे. दर वर्षी महानगरपालिका मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते. मात्र प्रत्यक्षात खबरदारी न घेतल्याने माणसं किड्या-मुंग्यांप्रमाणे मरत आहे. मुंबई तुंबली की तेव्हा सरकारला जाग येते असा आरोप पवार यांनी केला. जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत, असा खोचक टोला अजित पवारांनी भाजप-शिवसेनेला लगावला.

सगळं व्यवस्थित काम करत आहे असं सांगितलं जातंय, प्रत्यक्षात तसे होत नाही. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले असताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नाही असा दावा करतात. हा सत्तेचा माज आहे.गरज भासल्यास मनपा बरखास्त करा, अशी मागणी सुद्धा अजित पवार यांनी केली.