शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pune-Mumbai Expressway Toll Rates: वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 00:20 IST

एकीकडे सततच्या वाढत्या महागाईने त्रस्त असणाऱ्या सामान्यांच्या खिशाला टोल दरवाढीमुळे आणखी कात्री लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai-Pune Expressway Toll Rates: एकीकडे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मुंबईपुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महाग होणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलच्या दरांमध्ये लवकरच वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. आताच्या दरांपेक्षा सुधारित दरांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सन २००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, सन २०२३ मधील टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे. 

यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांनी वाढ

मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असून, कमी वेळेत जलदरित्या मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला येणे या एक्स्प्रेस वेमुळे शक्य झाले आहे. मात्र, अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रश्न उपस्थित केले जातात. वाहतूक कोंडीवर तोडगा नाही आणि आपत्कालीन मदत तसेच सुविधा पुरवल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. मात्र टोल वाढ नियमित कालावधीत होत आहे. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

दरम्यान, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. यापूर्वीही दिग्गज मंडळी, कलाकार, सामान्य प्रवाशांना या मार्गावरील अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणे