लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या २०० पेक्षा जास्त बस अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याचा परिणाम म्हणून बुधवारी सुमारे १४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून त्याचा फटका प्रवाशांना बसला, तसेच वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांची गैरसोय झाल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ डेपोच्या बस १२ ते १४ तासांपेक्षा जास्त उशिराने आल्याने चालक वाहकांच्या ड्यूटीवर त्याचा परिणाम झाला. थकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेसाठी बसवर ड्यूटी लावणे प्रवाशांच्या हिताचे नसल्याने फेऱ्या रद्द केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
ई-शिवनेरीला सर्वाधिक फटका
वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका मुंबई-पुणे या ई-शिवनेरी सेवेवर झाला. दिवसभरात या सेवेच्या ७३ फेऱ्या रद्द केल्या, तर इतर ६६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
बस पनवेलहून परत माघारी
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे वंदना व खोपट आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. सकाळी ९ वाजता बस स्वारगेटकडे रवाना झाली, मात्र ११ वाजता सुटलेली एसटी पनवेलपर्यंत पोहोचताच महामार्गावरील परिस्थितीची माहिती प्रवाशांना मिळाली. दीर्घकाळ कोंडीत अडकण्याऐवजी परतीचा प्रवास योग्य असल्याची भूमिका प्रवाशांनी घेतली आणि चालक, वाहकाकडे बस परत ठाण्याकडे वळविण्याची विनंती केली. त्यानुसार ती बस पनवेलहून ठाण्यात परत आली. ठाण्यातून दररोज पुण्याकडे एकूण १८ फेऱ्या होतात. बुधवारी १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
Web Summary : A tanker accident on the Mumbai-Pune Expressway caused massive traffic jams, stranding over 200 ST buses. Consequently, 140 trips were canceled, severely inconveniencing passengers. E-Shivneri services were particularly affected, with 73 trips axed. Some buses returned to Thane from Panvel due to the congestion.
Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर टैंकर दुर्घटना से भारी जाम लग गया, जिससे 200 से अधिक एसटी बसें फंसी रहीं। परिणामस्वरूप, 140 यात्राएँ रद्द कर दी गईं, जिससे यात्रियों को भारी असुविधा हुई। ई-शिवनेरी सेवाएं विशेष रूप से प्रभावित हुईं, 73 यात्राएँ रद्द हुईं। कुछ बसें जाम के कारण पनवेल से ठाणे लौट गईं।