शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार; NHAI चा हायकोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 07:58 IST

हे केवळ पॅचवर्क असेल. सर्व काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल

ठळक मुद्देठाणे ते नाशिक या १२१ कि. मी. लांबीच्या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे ठाणे ते वडापे या २४ कि. मी.  रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.९७ कि.मी.पैकी चार ते पाच कि.मी. लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि २५ ऑक्टोबरपर्यंत या महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयाला सोमवारी दिले. मुंबई-नाशिक महामार्गावर १०० किलोमीटर प्रवासासाठी १२० रुपये मोजावे लागतात. मुंबई-आग्रा महामार्गाचाच भाग असलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

यासंदर्भात वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची स्वयंप्रेरणेने (सुओ-मोटो) दखल  घेत मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने गेल्या सुनावणीत राज्य सरकार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ही बाब गांभीर्याने घेऊन यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. सोमवारच्या सुनावणीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खंडपीठाला सांगितले की, ठाणे ते नाशिक या १२१ कि. मी. लांबीच्या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि हे काम २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर हे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण होईल.

ठाणे ते वडापे या २४ कि. मी.  रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी तीन पथके काम करत आहेत. हे काम ५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्र सरकार व प्राधिकरणातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली. वडापे ते नाशिक या उर्वरित ९७ कि.मी. महामार्गाच्या दुरुस्तीचे व खड्डे बुजविण्याचे काम तीन आठवड्यांत पूर्ण होईल. त्यासाठी सात पथके काम करत आहेत. ९७ कि.मी.पैकी चार ते पाच कि.मी. लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आम्ही येथील कामही तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.पुढील सुनावणी २५ ऑक्टोबरला हे केवळ पॅचवर्क असेल. सर्व काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल, असे सिंग यांनी नमूद केले. २४ सप्टेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला महामार्गांच्या दुरवस्थेबद्दल थोडे गंभीर होण्यास  सांगितले होते. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच दोन ते तीन तास वाहतूककोंडी होत असल्याने इंधनही वाया जाते. त्याचा पर्यावरणावरही परिणाम होत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. राज्य सरकार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेHigh Courtउच्च न्यायालय