शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
4
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
5
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
6
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
7
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
8
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
9
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
10
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
11
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
12
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
13
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
14
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
15
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
17
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
18
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
19
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
20
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका

मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार; NHAI चा हायकोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 07:58 IST

हे केवळ पॅचवर्क असेल. सर्व काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल

ठळक मुद्देठाणे ते नाशिक या १२१ कि. मी. लांबीच्या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे ठाणे ते वडापे या २४ कि. मी.  रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.९७ कि.मी.पैकी चार ते पाच कि.मी. लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि २५ ऑक्टोबरपर्यंत या महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयाला सोमवारी दिले. मुंबई-नाशिक महामार्गावर १०० किलोमीटर प्रवासासाठी १२० रुपये मोजावे लागतात. मुंबई-आग्रा महामार्गाचाच भाग असलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

यासंदर्भात वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची स्वयंप्रेरणेने (सुओ-मोटो) दखल  घेत मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने गेल्या सुनावणीत राज्य सरकार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ही बाब गांभीर्याने घेऊन यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. सोमवारच्या सुनावणीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खंडपीठाला सांगितले की, ठाणे ते नाशिक या १२१ कि. मी. लांबीच्या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि हे काम २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर हे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण होईल.

ठाणे ते वडापे या २४ कि. मी.  रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी तीन पथके काम करत आहेत. हे काम ५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्र सरकार व प्राधिकरणातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली. वडापे ते नाशिक या उर्वरित ९७ कि.मी. महामार्गाच्या दुरुस्तीचे व खड्डे बुजविण्याचे काम तीन आठवड्यांत पूर्ण होईल. त्यासाठी सात पथके काम करत आहेत. ९७ कि.मी.पैकी चार ते पाच कि.मी. लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आम्ही येथील कामही तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.पुढील सुनावणी २५ ऑक्टोबरला हे केवळ पॅचवर्क असेल. सर्व काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल, असे सिंग यांनी नमूद केले. २४ सप्टेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला महामार्गांच्या दुरवस्थेबद्दल थोडे गंभीर होण्यास  सांगितले होते. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच दोन ते तीन तास वाहतूककोंडी होत असल्याने इंधनही वाया जाते. त्याचा पर्यावरणावरही परिणाम होत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. राज्य सरकार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेHigh Courtउच्च न्यायालय