शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

मुंबई : भारताचे जागतिक महाद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:37 IST

भव्य, प्रमाणबद्ध आकार असलेल्या वास्तू जगातील सर्वच महानगरांमध्ये प्रसिद्ध आहेत. न्यूयॉर्कची स्वातंत्र्यदेवी, लंडनचा बिगबेन घड्याळाचा मनोरा, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि विजय कमान. तसेच मुंबईचे गेटवे आॅफ इंडिया. मुंबईमध्ये येणा-यांचे स्वागत करणारी कमान.

- सुलक्षणा महाजनमुंबईमधील गेटवे आॅफ इंडिया हे भारतामधून, जगामधून मुंबई बघायला येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण. लहानपणी मुंबई बघायला आले असताना ते भव्य आणि देखणे वास्तुशिल्प बघितले होते. भव्य, प्रमाणबद्ध आकार असलेल्या वास्तू जगातील सर्वच महानगरांमध्ये प्रसिद्ध आहेत. न्यूयॉर्कची स्वातंत्र्यदेवी, लंडनचा बिगबेन घड्याळाचा मनोरा, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि विजय कमान. तसेच मुंबईचे गेटवे आॅफ इंडिया. मुंबईमध्ये येणा-यांचे स्वागत करणारी कमान.भारतामधील ऐतिहासिक, पारंपरिक शहरांना तटबंदी असे. शहरात प्रवेश करण्यासाठी चारी दिशेला महाद्वारे असत. अशी महाद्वारे ही आपली परंपरा. याउलट लढाईमधील विजय साजरा करण्यासाठी मोठी कमान उभारणे ही पाश्चात्त्यांची परंपरा. या दोन परंपरांच्या संगमातून गेटवेची वास्तुरचना घडली असावी असे मला वाटते. या वास्तूला मुक्तद्वार म्हणायला हवे, कारण ते कधीच बंद होत नाही. मुक्त व्यापाराचा ढोल वाजवत विकसित झालेल्या मुंबईला वेगळ्या तटबंदीची, बाद दरवाजाची आवश्यकता नव्हती. ब्रिटिशांची सत्ता स्थिरावली आणि ब्रिटनची राणी भारताची महाराणी झाली. नंतर पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गेटवेची वास्तू बांधली. तेव्हापासून भारताचे सर्वात आधुनिक आणि आकर्षक शहर म्हणून मुंबईची ख्याती जगभर झाली.वास्तुकला शिक्षणाने जागतिकतेचे ज्ञान आणि भान दिले. जगभरातील वास्तुकलेचा इतिहास शिकता शिकता जगाची ओळख व्हायची. त्याचबरोबर भारतीय खंडातील वास्तुकलेचा इतिहास, येथील विविध काळातील वास्तुशैलींचा अभ्यास तर तपशिलात केला जायचा. मुंबईमधील फोर्ट विभाग म्हणजे वास्तुकलेचा, अनेक शैलींचा संगम असलेला जिताजागता इतिहास. जे.जे. कला महाविद्यालयातील दगडी वास्तू ब्रिटिश क्लासिक शैलीची ओळख करून देणारी होती. मुंबई महापालिका, व्ही.टी. रेल्वे स्टेशन या वास्तू गॉथिक शैलीचे सुंदर नमुने युरोपच्या संस्कृतीशी नाळ जोडून द्यायचे. याशिवाय आधुनिक काळातील आर्ट डेको शैलीतील रिगल, इरॉस, मेट्रो सिनेमागृहे, मरिन ड्राइव्हवरील इमारती, आणि नंतरच्या जीवन बिमासारख्या आधुनिक शैलीतील वास्तू आजूबाजूला असताना जगाचे भान यायचे. मुंबादेवी मंदिर, गिरगाव, गिरणगाव, भायखळ्यातील मशिदी आणि चर्च यामधून मुंबईचे सर्वधर्मीय स्थानिक स्वरूप समजून यायचे. स्थानिक, भारतीय आणि जागतिक वास्तुकलेचा सुंदर मिलाफ असलेले हे महानगर. आज मुंबईचे भौतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वरूप पार बदलले आहे. इथला प्रत्येक विभाग आता स्वत:चा विचार करतो. मुंबई बेट, उपनगरे यात तणाव आहेत.जगभरातील लोक मुंबईला जागतिक महानगर मानत असले तरी उपनगरे मात्र गोंधळली आहेत. ६० वर्षांपूर्वीची उदार, आशादायी, प्रगत, जगाबरोबर राहणारी मुंबई आता हरवली आहे. एकेकाळी मुंबईत यायला लोक धडपडायचे, आता येथून बाहेर पडण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. परंतु गेट वे आॅफ इंडियाचे जगाला सन्मुख असलेले महाद्वार आणि मुंबई आता आकर्षक राहिलेली नाही. ते आता गेट अवे, म्हणजेच बाहेर ढकलणारे महाद्वार झाले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईIndiaभारत