शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई : भारताचे जागतिक महाद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:37 IST

भव्य, प्रमाणबद्ध आकार असलेल्या वास्तू जगातील सर्वच महानगरांमध्ये प्रसिद्ध आहेत. न्यूयॉर्कची स्वातंत्र्यदेवी, लंडनचा बिगबेन घड्याळाचा मनोरा, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि विजय कमान. तसेच मुंबईचे गेटवे आॅफ इंडिया. मुंबईमध्ये येणा-यांचे स्वागत करणारी कमान.

- सुलक्षणा महाजनमुंबईमधील गेटवे आॅफ इंडिया हे भारतामधून, जगामधून मुंबई बघायला येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण. लहानपणी मुंबई बघायला आले असताना ते भव्य आणि देखणे वास्तुशिल्प बघितले होते. भव्य, प्रमाणबद्ध आकार असलेल्या वास्तू जगातील सर्वच महानगरांमध्ये प्रसिद्ध आहेत. न्यूयॉर्कची स्वातंत्र्यदेवी, लंडनचा बिगबेन घड्याळाचा मनोरा, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि विजय कमान. तसेच मुंबईचे गेटवे आॅफ इंडिया. मुंबईमध्ये येणा-यांचे स्वागत करणारी कमान.भारतामधील ऐतिहासिक, पारंपरिक शहरांना तटबंदी असे. शहरात प्रवेश करण्यासाठी चारी दिशेला महाद्वारे असत. अशी महाद्वारे ही आपली परंपरा. याउलट लढाईमधील विजय साजरा करण्यासाठी मोठी कमान उभारणे ही पाश्चात्त्यांची परंपरा. या दोन परंपरांच्या संगमातून गेटवेची वास्तुरचना घडली असावी असे मला वाटते. या वास्तूला मुक्तद्वार म्हणायला हवे, कारण ते कधीच बंद होत नाही. मुक्त व्यापाराचा ढोल वाजवत विकसित झालेल्या मुंबईला वेगळ्या तटबंदीची, बाद दरवाजाची आवश्यकता नव्हती. ब्रिटिशांची सत्ता स्थिरावली आणि ब्रिटनची राणी भारताची महाराणी झाली. नंतर पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गेटवेची वास्तू बांधली. तेव्हापासून भारताचे सर्वात आधुनिक आणि आकर्षक शहर म्हणून मुंबईची ख्याती जगभर झाली.वास्तुकला शिक्षणाने जागतिकतेचे ज्ञान आणि भान दिले. जगभरातील वास्तुकलेचा इतिहास शिकता शिकता जगाची ओळख व्हायची. त्याचबरोबर भारतीय खंडातील वास्तुकलेचा इतिहास, येथील विविध काळातील वास्तुशैलींचा अभ्यास तर तपशिलात केला जायचा. मुंबईमधील फोर्ट विभाग म्हणजे वास्तुकलेचा, अनेक शैलींचा संगम असलेला जिताजागता इतिहास. जे.जे. कला महाविद्यालयातील दगडी वास्तू ब्रिटिश क्लासिक शैलीची ओळख करून देणारी होती. मुंबई महापालिका, व्ही.टी. रेल्वे स्टेशन या वास्तू गॉथिक शैलीचे सुंदर नमुने युरोपच्या संस्कृतीशी नाळ जोडून द्यायचे. याशिवाय आधुनिक काळातील आर्ट डेको शैलीतील रिगल, इरॉस, मेट्रो सिनेमागृहे, मरिन ड्राइव्हवरील इमारती, आणि नंतरच्या जीवन बिमासारख्या आधुनिक शैलीतील वास्तू आजूबाजूला असताना जगाचे भान यायचे. मुंबादेवी मंदिर, गिरगाव, गिरणगाव, भायखळ्यातील मशिदी आणि चर्च यामधून मुंबईचे सर्वधर्मीय स्थानिक स्वरूप समजून यायचे. स्थानिक, भारतीय आणि जागतिक वास्तुकलेचा सुंदर मिलाफ असलेले हे महानगर. आज मुंबईचे भौतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वरूप पार बदलले आहे. इथला प्रत्येक विभाग आता स्वत:चा विचार करतो. मुंबई बेट, उपनगरे यात तणाव आहेत.जगभरातील लोक मुंबईला जागतिक महानगर मानत असले तरी उपनगरे मात्र गोंधळली आहेत. ६० वर्षांपूर्वीची उदार, आशादायी, प्रगत, जगाबरोबर राहणारी मुंबई आता हरवली आहे. एकेकाळी मुंबईत यायला लोक धडपडायचे, आता येथून बाहेर पडण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. परंतु गेट वे आॅफ इंडियाचे जगाला सन्मुख असलेले महाद्वार आणि मुंबई आता आकर्षक राहिलेली नाही. ते आता गेट अवे, म्हणजेच बाहेर ढकलणारे महाद्वार झाले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईIndiaभारत