शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भरपाईच्या ८० टक्के मोबदल्याचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 12:56 IST

१४५० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन हस्तांतरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, जिल्ह्यातील समाविष्ट  पाच तालुक्यांमधील एकूण ९४.४ टक्के जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. खेडमध्ये १०० टक्के ताबा  देण्यात आला आहे. या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा जमीनमालकांना भूसंपादन संस्थेकडून शासकीय दराच्या सुमारे चारपट भरपाईची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८० टक्के भरपाई रकमेचे (१४५० कोटी) वाटप झाले आहे.

मुंबई - गोवा महामार्ग देशातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. पनवेल, महाड, खेड, चिपळूण,  संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी ही या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाची शहरे आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीनही जिल्हे जोडणारा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा असा महामार्ग जानेवारी २०१९ सालापर्यंत पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ते राजापूर या सहा तालुक्यांमधील २०५.५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १०२ गावांमधील एकूण ४१५.८७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. २९,८५३ खातेदार या मोबदला वाटपासाठी पात्र आहेत.

यासाठी भूसंपादन संस्थेकडून  २०४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत १८२८ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, १४५० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होण्यासाठी दीड - दोन वर्षाचा कालावधी गेला असला, तरी  भूसंपादन संस्थेकडून मोबदल्याची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे फेब्रुवारी २०१७मध्ये प्राप्त झाली होती. सध्या या सहाही तालुक्यांमध्ये मोबदला वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मोबदला वाटपाचे कामही ८० टक्के पूर्णत्त्वाला गेले आहे. २० टक्के निधी वाटपाचे काम खातेदारांच्या वादामुळे रेंगाळले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया आता पूर्णत्त्वाकडे जावू चालली आहे.  ४२२.५१पैकी जिल्हा प्रशासनाने ४१५.२७ हेक्टर क्षेत्र संपादित केले असून, ३९२.५७ हेक्टर (९४.४ टक्के) क्षेत्राचा ताबा महामार्ग प्राधिकरणकडे देण्यात आला आहे. तर उर्वरित ५.६ टक्के जमिनीचा ताबाही लवकरच देण्यात येणार आहे. महामार्ग चौपदरीकरण प्रक्रियेतील अडथळे दूर झाल्याने पुढील प्रत्यक्ष कामाला आता वेग येणार आहे. 

४१५.८७ हेक्टर क्षेत्र संपादितमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात भूसंपादनाचा मोठा अडथळा होता. मात्र, तो आता बहुतांशी प्रमाणात दूर झाल्याने चौपदरीकरणाचे काम वेगात सुरु होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ४१५.८७ हेक्टर क्षेत्राचे यासाठी संपादन करण्यात आले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग