शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी केलेल्या आरोपांनंतर महाराष्ट्र सरकार Sameer Wankhede यांची चौकशी करणार? गृहमंत्री Dilip Walse Patil यांचं मोठं विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:51 IST

Mumbai Drug Case: एनसीबीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून राज्य सरकारमधील मंत्री Nawab Malik आणि NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede आमने-सामने आले आहेत.

मुंबई - अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीविरोधात समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखाली एनसीबीकडून सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. दरम्यान, एनसीबीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, काल एका सभेत बोलताना नवाब मलिक यांनी एका वर्षांत समीर वानखेडेंची नोकरी घालवणार. त्यांची तुरुंगात रवानगी करणार, असे विधान केले होते. त्यामुळे राज्य सरकार समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. 

नवाब मलिक यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्य सरकारकडून समीर वानखेडेंची चौकशीचे आदेश देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ते केंद्र सरकारच्या यंत्रणेमधून काम करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नेमकं काय विधान केलं, याबाबत मला फारशी माहिती नाही. त्यांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. मात्र सध्यातरी मला याबाबत काही माहिती नाही, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील मावळ येथे एका सभेला संबोधित करताना नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात जोरदार टीका केली होती. मी खुले आव्हान देतो की, एका वर्षाच्या आत समीर वानखेडे यांची नोकरी घालवणार, समीर वानखेडेंना तुरुंगवास निश्चित आहे. तुम्ही केलेला खोटारडेपणा जनतेच्या समोर आणणार, समीर वानखेडे यांचे वडील आणि त्यांच्या घरातील सर्व लोक बोगस आहेत, असे नवाब मलिक म्हणाले होते. दरम्यान, याबाबत समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नवाब मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnawab malikनवाब मलिकPoliticsराजकारण