शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अहो आश्चर्यम्.... मुंबई झाले थंड हवेचे ठिकाण, पारा १३वर; महाबळेश्वरलाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 06:30 IST

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचा हा परिणाम असून, झोंबणारी ही थंडी मुंबईकरांना आणखी काही दिवस अनुभवायला मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दमट हवा आणि सतत घामाच्या धारांना सरावलेल्या मुंबईकरांना थंडीचे मोठे अप्रूप. त्यामुळे हिवाळ्याची ते आवर्जून वाट पहात असतात. दिवाळीनंतर आलेल्या थंडीने या महानगरात बस्तान बसवले असे वाटत असतानाच पुन्हा गरमीने डोके वर काढले होते. मात्र, या गरमीवर मात करून आता पुन्हा थंडी परतली असून, मुंबईचा पारा चक्क १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचा हा परिणाम असून, झोंबणारी ही थंडी मुंबईकरांना आणखी काही दिवस अनुभवायला मिळणार आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हिमालयीन पर्वत रांगांतून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी परत आली असून, राज्यातील अनेक शहरांच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. विशेष म्हणजे मुंबईचे तापमान १३, तर महाबळेश्वरचे १५ असून, वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांना आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटता येत आहे.

२४ डिसेंबर २०१५ रोजी मुंबईचे किमान तापमान ११.४ होते. त्यानंतर ९ वर्षे डिसेंबरमध्ये पारा एवढ्या खाली घसरला नव्हता. यंदा मात्र डिसेंबरच्या सुरुवातीलाच पारा चक्क १३ अंशांपर्यंत खाली आला असून, ही नोंद १३.७ आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईकरांना गारेगार वातावरणाचा आनंद लुटता येईल.- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

टॅग्स :weatherहवामान