शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

MPSC: Best of Luck! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा; राज्यभरातून दहा हजार २३२ परीक्षार्थीं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 07:12 IST

२६ परीक्षा केंद्रांवर आसनव्यवस्था, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरटीओ, आयकर आदी विभागांच्या वर्ग १ व वर्ग २ च्या पदांसाठी ही राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१७ घेण्यात येत आहे.

मुंबई/ठाणे : विविध कारणांनी गाजलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा म्हणजे एमपीएससीची परीक्षा अखेर २१ मार्च रोजी पार पडत आहे. यासाठी राज्यभरातून तब्बल दहा हजार २३२ परीक्षार्थींची ठाणे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या २६ परीक्षा केंद्रांवर आसनव्यवस्था केलेली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेसोबत या परीक्षार्थींना सॅनिटायझर व मास्कचेही परीक्षा केंद्रांवर वाटप करण्यात येणार आहे.

तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरटीओ, आयकर आदी विभागांच्या वर्ग १ व वर्ग २ च्या पदांसाठी ही राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१७ घेण्यात येत आहे. अखेर ठाणे शहर परिसरातील २६ शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांवर या दहा हजार २३२ परीक्षार्थींची आसनव्यवस्था केली आहे. सकाळी ११ ते ५ या वेळेत ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाणार आहे. यासाठी ८०० मनुष्यबळासह पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ती घेतली जात आहे. या दहा हजारपेक्षा जास्त परीक्षार्थींना दोन एमएल सॅनिटायझर व प्रत्येकास मास्कचे वाटप परीक्षा केंद्रांवर करण्यात येणार आहे. याशिवाय लोकसेवा आयोगाच्या आदेशास अनुसरून ठिकठिकाणी पीपीई किटची व्यवस्थाही केलेली आहे. 

मात्र, या किटची मागणी आतापर्यंत तरी एकाही परीक्षार्थीने नोंदवली नाही. तरीदेखील परीक्षा केंद्रांवर त्याची व्यवस्था केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आल्याची ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून विद्यार्थ्यांसाठी ही एसओपी जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय लोकसेवा आयोगाच्या आदेशास अनुसरून ठिकठिकाणी पीपीई किटची व्यवस्थाही केलेली आहे. 

विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर एमपीएससी उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल संधीची मर्यादा निश्चित केली असून यापुढे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ६ वेळा परीक्षा देता येणार आहे. इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणखी चिंतातुर झाले. या पार्श्वभूमीवर मागील वेळी परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संयमांचा उद्रेक झाला आणि दुसऱ्या दिवशीच सरकारकडून परीक्षेचे २१ मार्च रोजी पुनर्नियोजन करण्यात आले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा