शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लढायचे असेल तर कमळ चिन्हावर लढा अन्यथा...; विनायक राऊतांचा दावा, शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 13:24 IST

सध्या राज्यातील जनतेमध्ये जो काही रोष आहे त्याचं प्रत्यक्ष रुपांतर निवडणुकीच्या मतदानातून दिसून येईल असंही विनायक राऊतांनी म्हटलं. 

रत्नागिरी - महाराष्ट्रात गद्दार गट, अजित पवार गट आणि भाजपामध्ये जागावाटपावेळी एकमेकांच्या उरावर बसण्याचा प्रयत्न नक्की होणार आहे. भाजपा गद्दार गटाला फेकून देणार आहे. लढायचे असेल तर कमळ चिन्हावर लढा अन्यथा आम्ही आमचा उमेदवार उभा करू अशाप्रकारे भाजपा शेवटचा डाव टाकणार आहे. त्यामुळे कितीही बसले तरी महाविकास आघाडीच्या ३५ हून अधिक जागा निवडून येतील असा दावा खासदार विनायक राऊतांनी केला आहे. 

विनायक राऊत म्हणाले की, कोकणासह राज्यातील अनेक मतदारसंघात शिंदे गटाच्या खासदारांना लढायचे असेल तर कमळावर लढा असं म्हटलं गेले आहे. त्यात मावळ, रामटेक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, हातकणंगले सगळीकडे भाजपाचे उमेदवार उभे राहतील असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवडी-न्हावा प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत अधिक गती मिळाली. नारळ फोडण्याचे श्रेय ते घेतील. निवडणुकीसाठी आता जास्त दिवस नाहीत. १५ फेब्रुवारीनंतर आचारसंहिता कधीही लागेल. त्या अगोदर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मोदींचा वापर केला जातो. तो वापर महायुतीला फलदायी ठरणार नाही. सध्या राज्यातील जनतेमध्ये जो काही रोष आहे त्याचं प्रत्यक्ष रुपांतर निवडणुकीच्या मतदानातून दिसून येईल असंही विनायक राऊतांनी म्हटलं. 

१० जानेवारी लोकशाहीसाठी काळा दिवस

देशाच्या लोकशाहीत १० जानेवारी काळा दिवस मानला गेला पाहिजे. संविधानाची तोडमोड करायचं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही कसं पायदळी तुडवायचे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवून दिले आहे. राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल केवळ उद्धव ठाकरेंसाठी नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला नेस्तनाबूत करण्याचा निकाल आहे. राज्यातील मराठी माणसांचे अस्तित्व संपवायचे आणि सर्वांना अहमदाबाद आणि सूरतेचे गुलाम बनवायचे. महाराष्ट्राला सूरत आणि अहमदाबादची गुलामी करायला लावायची हा कट होता आणि या कटात दुर्दैवाने राज्यातील गद्दार गट सामील झाले. छत्रपतींच्या स्वराज्याला जसा धोका निर्माण झाला होता तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे आज घडले आहे असं विनायक राऊतांनी आरोप केला. 

दरम्यान, नार्वेकरांनी जे स्क्रिप्ट वाचन केले त्याचे सूतोवाच मंत्री दिपक केसरकरांनी लावले होते. निकाल वाचनाची वेळ ४.३० ची असतानाही प्रत्यक्ष निकाल वाचन ५.३० ला झाले. कारण त्याचवेळी हिंगोलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू होते. हे भाषण लाईव्ह करण्याची संधी त्यांना दिली. त्यामुळे हे पोपटपंची कुणाची करतायेत हे दिसून आले असंही राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा