शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वर्षभरात कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची  समस्या होणार दूर? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 6:27 PM

येत्या वर्षभरात कल्याण डोंबिवली शहरातील वाहतुकीची समस्या दूर होईल असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

लोकमत  न्यूज नेटवर्क 

कल्याण:कल्याणडोंबिवलीतील प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे वाहतूक कोंडी ! मात्र येत्या वर्षभरात कल्याण डोंबिवली शहरातील वाहतुकीची समस्या दूर होईल असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शहरात  विकासाची कामे सुरू असून लवकरच वाहतूक कोंडी दूर होईल असे ते म्हणाले.डोंबिवलीतील एमआयडीसी विभागातील सर्व रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या 110 कोटी रुपयांच्या निधींबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डोंबिवलीतील मोठागाव माणकोली उड्डाणपूल काही महिन्यात पूर्ण होणार आहे. काही महिन्यांपूर्वी पत्रिपुलाचे काम पूर्ण झाले. नवीन  दुर्गाडी पुलाच्या दोन लेनही वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या असून उर्वरित पुलाचे कामही लवकर केले जाईल. कल्याण शिळ मार्गावरील उड्डाणपूलही काम प्रगती पथावर आहे. रिंगरोडचे कामही येत्या वर्षभरात पूर्ण होईल असे खासदार शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे वर्षभरात वाहतूक कोंडीची समस्या  दूर होईल असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

एमआयडीसीच्या रस्त्यांच्या कामासाठी एमआयडीसीकडून 57 आणि एमएमआरडीएकडून 53 असा तब्बल 110 कोटीचा निधी मंजुर करून घेण्यात आपल्याला यश आले  असून यामुळे एमआयडीसी परीसरातील 35 रस्ते   सिमेंट  काँक्रिटचे होणार आहेत असेही ते म्हणाले. केडीएमसी आणि एमआयडीसी या दोन्ही शासकीय संस्था लवकरच या रस्त्यांच्या कामाचे टेंडर काढतील आणि त्यांचे काम सुरू होईल. तोपर्यंत इथल्या रस्त्यांची केडीएमसी प्रशासनामार्फत डागडुजी केली जाणार असल्याचेही  शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आम्ही श्रेयवादात पडत नाही. जे काम करतो ते छातीठोकपणे सांगतो. घोषणाबाजीही करत नाही असे सांगत अप्रत्यक्षरित्या त्यांनी भाजपाला टोला लगावला. आपण काय करतो किंवा बाकी कोण काय करतं यापेक्षा माझे काम काय? मला लोकांनी कशाला निवडून दिले आहे या विकासाच्या दृष्टीने आपण काम करत असल्याचेही खासदार  शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीTrafficवाहतूक कोंडीShiv Senaशिवसेना