शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २ वेगळे कायदे आहेत का? सुलतान प्रचारात दंग; संजय राऊत सरकारवर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:31 IST

गद्दार आणि बेईमान लोकांना वेगळा कायदा आणि इतरांसाठी वेगळा कायदा लावला असेल तर तसे जाहीर करावे असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - आमच्या दत्ता दळवींची काहींनी गाडी फोडली, ठीकय..दळवी बाहेर येतील आणि आमचे शिवसैनिक जागेवरच आहेत. ज्यांनी गाडी फोडली त्यांनी जर खरा मर्द असता तर तिथेच थांबायला पाहिजे होते. पळून काय जाताय? तुम्ही तुमच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आलेला आहात मग तुमचा नेता नामर्द आहे का? अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर घणाघात केला आहे. 

भांडुप येथे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले म्हणून त्यांना अटक केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी दत्ता दळवी यांचे वाहन फोडले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही गाडी फोडली, पळून का जाता आम्ही तिथे आलोच असतो. शिवसैनिक पोहचलेच असते. या नामर्दानगी म्हणतात. राज्यात नामर्दाचे सरकार आहे.सुप्रिया सुळेंवर अपशब्द वापरले त्या अब्दुल सत्तारवर काय कारवाई केली? प्रकाश सुर्वेने तंगड्या तोडण्याची भाषा केली काय कारवाई केली? त्यांच्या मुलाने पिस्तुल दाखवत एका बिल्डरचे अपहरण केले तु्म्ही काय कारवाई केली? भाजपा, मिंदे गटाच्या आमदारांवर काय कारवाई केली याचे उत्तर तुम्ही आधी द्या. मग दत्ता दळवी यांच्या कारवाईवर बोला असं त्यांनी सांगितले. 

तसेच या राज्यात २ कायदे आहेत का? गद्दारांसाठी वेगळा आणि जनतेसाठी वेगळा..गद्दार आणि बेईमान लोकांना वेगळा कायदा आणि इतरांसाठी वेगळा कायदा लावला असेल तर तसे जाहीर करावे. राज्यपाल हे घटनात्मक पदावर आहेत. त्यांनी सांगावे. राज्यात २ कायदे आहेत का? जो शब्द दत्ता दळवींनी वापरला तो चित्रपटात वापरला जातो, तो कापला जात नाही. आनंद दिघेंवर दंतकथात्मक चित्रपट बनवला त्यात दिघेंच्या तोंडी तो शब्द आहे. दिघेंनी वापरलेला शब्द त्यांच्या शिवसैनिकांनी वापरला तर तुम्ही त्याला तुरुंगात टाकता. हा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचा अपमान नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. 

दरम्यान, दत्ता दळवी प्रकरणी पोलिसांवर दबाव आहे. मी असो वा अन्य कुठलाही शिवसैनिक तुरुंगात गेल्यानं घाबरणार नाही. आम्ही डरपोक आणि नामर्द नाही. राज्यात शेतकरी हवालदिल आहेत. अवकाळी पावसामुळे गंभीर स्थिती झालीय. शेतकरी बांधावर आहे, मनात आत्महत्येचे विचार येतायेत. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. सरकार कुठे आहे? सरकार पसार झालं आहे. अस्मानी संकट कोसळत असताना राज्याचे मुख्य सुलतान आणि २ डेप्युटी सुलतान हे प्रचारात गेलेत. सुलतान तेलंगणा, जयपूर असं निवडणूक पर्यटन सुरू आहे असा आरोपही संजय राऊतांनी राज्य सरकारवर केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी