शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:50 IST

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं.

नवी दिल्ली - शरद पवारांशी बोलून जर पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच ते सरकार चालले असते. सरकार ७२ तासांत कोसळले नसते. देवेंद्र फडणवीसांबद्दल काय बोलू? अलीकडे त्यांची वक्तव्ये पाहतोय. फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. आधी ८ आश्चर्य आहेत. २ आश्चर्य दिल्लीत बसलेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, माणसाने किती खोटे बोलावे. मूळात तुम्ही विश्वासघात केल्यामुळे अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देण्याचं भाष्य केले होते. अमित शाह यांच्यासमोर सत्तेचे वाटप ५०-५० टक्के झाले होते. विश्वासघात त्यांनी केल्यामुळे आता गळा काढण्यात काय अर्थ आहे? पहाटेच्या शपथविधीतून देवेंद्र फडणवीस बाहेर पडले नाहीत. सहा महिन्यांपूर्वी जो ४० आमदार बाहेर पडून सूरत-गुवाहाटीमार्गे परतले आणि त्यानंतर शपथविधी झाला तो शरद पवारांमुळेच झाला असंही सांगू शकतात असंही त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत एका वैफल्यातून ते बोलतायेत. महाराष्ट्रात त्यांच्या सरकारविषयी अत्यंत तिरस्कार आणि घृणा आहे. नागपूर-विदर्भात ते हरलेत. विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. कसबा, चिंचवड विधानसभेत त्यांचा पराभव दिसत आहे. त्यातून लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशी विधाने करत आहेत असं सांगत राऊतांनी फडणवीसांवर शरसंधान साधले. 

दरम्यान, अजित पवार हे ठामपणे, मजबुतीने महाराष्ट्रात एक वातावरण निर्मिती करत आहेत. भाजपाविरोधात लढा देतायेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. पहाटेचा शपथविधीने अजूनही फडणवीसांना दचकून जाग येते. त्यावर फडणवीसांनी उपचार करायला हवेत. राज्यातील वातावरण मिंदे-फडणवीसांविरोधात आहे. त्याचा परिणाम असल्याने अशी विधान देवेंद्र फडणवीस करत आहेत असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?“२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा