शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

“कुणी कितीही ठरवले तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, ब्रँड मिटवता येणार नाही”; संजय राऊतांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:51 IST

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेंचे गुन्हे अनेकदा उद्धव ठाकरेंनी पोटात घातले. बाळासाहेबांनी यांना भरभरून दिले, असे सांगत संजय राऊतांनी टीका केली.

Sanjay Raut News: समर्थ रामदास स्वामींनी मूर्खांची जी दहा लक्षणे सांगितली आहेत, ती सर्व लक्षणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांमध्ये दिसतात. एकनाथ शिंदे यांचे गुन्हे अनेकदा उद्धव ठाकरेंनी पोटात घातले. बाळासाहेबांनी यांना भरभरून दिले आहे. कुणी कितीही उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत. ज्यांनी शिवसेनेचे तुकडे केले, पक्ष विकत घेतला आणि शिंदेच्या हातात सोपविला, अशा प्रवृत्तींशी कोणत्याही प्रकारे कोणत्याही संबंध ठेवू नये हात मिळविणे करू नये अशी आमची भूमिका आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह आणि मोदी यांनी ठरवले आहे की, महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड हा संपवायचा. अमित शाह यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस चोरांचा पक्ष स्थापन झाला. महाराष्ट्राच्या शत्रूशी कुणीही हात मिळविणी करू नये हेच आमचे मत आहे. अशा प्रकारे हात मिळविणी करणे ही महाराष्ट्राच्या हुतात्म्यांशी बेईमानी करणे असे आमचे मत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंदच होतो

मुंबईतील अंधेरी परिसरात एका विवाह सोहळ्यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली. तसेच त्यांनी एकमेकांशी औपचारिक संवाद साधला. यावेळी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. मागच्या तीन महिन्यात कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेली ही तिसरी भेट आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंदच होतो. अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते.

दरम्यान, दोन तारखेला शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते ठाण्याचा दौरा करतील.  शिवसैनिकांचे प्रश्न समजून घ्यावे पदाधिकाऱ्यांशी चर्चा कराव्या यासाठीच हा दौरा असणार आहे. पालघर ,कोकण ठाणे या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. पूर्वी विभागीय शिबिर शिवसेनेची होत होती. त्याची सुरुवात आम्ही मुंबईपासून करत आहोत. नऊ मार्च रोजी ईशान्य मुंबईचा विभागीय मेळावा आम्ही कालिदास सभागृहात घेऊ. दिवसभराची ही शिबिर असतील मराठ्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशी शिबिर करण्याची योजना आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे