शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मोदी-पवार भेट; राऊतांचे थेट भाष्य, म्हणाले, “महाराष्ट्राच्या भावना तुडवायचा प्रयत्न...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:11 IST

Sanjay Raut on PM Modi-Sharad Pawar Meet: लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला जाण्याच्या शरद पवारांच्या निर्णयावर ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Sanjay Raut on PM Modi-Sharad Pawar Meet: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. या सोहळ्याला जाऊ नये, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे शरद पवारांना करण्यात आले होते. मात्र, तरीही ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. शिवसेना ठाकरे गटाने यावरून नाराजीही व्यक्त केली होती. यातच आता संजय राऊत यांनी मोदी-पवार भेटीवर थेट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

ज्या पद्धतीने पक्ष फोडले, ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण केले, हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे. जनतेच्या मनात याविषयी रोष आहे. मोदी व्यासपीठावर होते. पण लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या मनातील खदखद कायम आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

महाराष्ट्राच्या भावना तुडवायचा प्रयत्न...

शरद पवार आणि मोदींच्या कार्यक्रमाविषयी वाद निर्माण झाले आहेत. पण आम्ही त्यावर पडदा टाकू. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आले, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याचा प्रयत्न झाला, जेव्हा जेव्हा दिल्लीच्या शत्रूंनी रात्रीच्या अंधारात महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राइक केला. हे पवार साहेबांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार आमच्यासोबत नक्कीच राहतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधक मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच हरियाणात हिंसाचार उफाळला आहे. याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. निवडणूक आल्यामुळे प्रत्येक राज्यात पेटवा-पेटवी सुरू होईल. प्रत्येक राज्यात अशा दंगलींना सामोरे जावे लागेल. निवडणुका जवळ आल्यावर भाजपाकडून खेळली जाणारी ही जुनी नीती आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी