शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

"एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात अनेकदा दिल्लीला गेले, अन्..."; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:03 IST

अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊतांचा प्रहार, राज ठाकरेंनाही जोरदार टोला

नवी दिल्ली - देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सरकार पाडण्याआधी दिल्ली, मुंबईत वेश पालटून फिरत होते. माझ्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेत ते मौलवीच्या वेशात गेले. त्यांना दाढी आहेच, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीत गेले होते असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार-अमित शाह यांच्या गुप्त बैठकींवर टीका करत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला आहे. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिंदेंनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली असली, आनंद दिघेंचे शिष्य म्हणवत असले तरी ते अनेकदा दिल्लीत मौलवीच्या वेशात आलेत. नाव बदलून अमित शाहांना भेटले, अजित पवार वेशांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात. एकनाथ शिंदे वेशांतर करून येतात. मात्र त्यांना विमानतळावर कुणी रोखत नाही. या दोघांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे. पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड बनवलेली आहे. ओळखपत्राशिवाय विमानतळावर सोडलं जात नाही. या प्रकाराची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने दखल घेऊन चौकशी होणं गरजेचे आहे. यातून त्यांनी दहशतवाद्यांना प्रेरणा दिली आहे असंही त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्रातील प्रमुख लोक यावर चर्चा करणार आहोत. हा प्रश्न अजित पवार, अमित शाहांचा नाही. आमच्यासाठी हा गंभीर विषय आहे. या देशात चीन का घुसतंय, काश्मीरमध्ये दहशतवादी का घुसतायेत हे या लोकांनी दाखवून दिलंय. फक्त वेश पालटून दिल्लीत गेले नाही तर बनावट नावांनी आलेत. AP अनंतराव, A पवार अशा विविध नावांनी दाढी मिशा लावून वेश बदलून आले होते. या महाराष्ट्राला रंगभूमीची परंपरा आहे. विष्णूदास भावेंनी १८४२-४४ मध्ये रंगभूमीची स्थापना केली. त्यानंतर हे नवे बारामतीचे विष्णूदास भावे तयार झालेत. विमानतळाची सुरक्षा किती दुर्लक्षित आहे, एखादा माणूस त्याच्या स्वार्थासाठी वेश बदलून दिल्ली, मुंबईसारख्या विमानतळावर घुसू शकतो. त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो. हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळ आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

राज ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका

दरम्यान, मी सुपारीबाजांबद्दल बोलत नाही. कधीकाळी लोकसभेत वेगळ्या पक्षाची सुपारी होती. विधानसभेला वेगळ्या पक्षाची सुपारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुपारीचं पीक आलेलं आहे. या सर्व सुपाऱ्या आहेत. भाजपा आणि शिंदे गट हे कधीही सुपाऱ्या कातरायचं काम करतात असं सांगत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर प्रहार केला आहे. महायुतीत मनसे तिसरा भिडू होण्याचा प्रयत्न करतंय असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला होता त्यावर राऊतांनी हे भाष्य केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरे