शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 13:53 IST

जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशिनमधून धुवून घेतात असा टोला राऊतांनी लगावला.

मुंबई – नवाब मलिक यांना १६ महिन्यांनी जामीन मिळाला त्याचा आनंद आहे. राजकीय विरोधकांना जामीन दिला जात नाही. मी, अनिल देशमुख, नवाब मलिक आहेत. हसन मुश्रीफांनी नवीन इंजेक्शन घेतल्याने ते सुटले. राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी अनेक कायदे केलेत. देशात ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायदे तुम्ही निर्माण केलेत आणि त्यातून विरोधकांना जेरीस आणण्यासाठी वापरतात असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर केला.

संजय राऊत म्हणाले की, जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशिनमधून धुवून घेतात. महाराष्ट्रात काय चाललंय बघा, नवाब मलिक १६ महिने तुरुंगात होते, परंतु ज्यांच्यावर असेच खटले होते त्यांना मंत्री केले आहे. जे काही चाललंय ते देश हुकुमशाहीकडे जाण्याचे लक्षण आहे. देशद्रोहाचा कायदा मागे घेतला याचे फार कौतुक करू नका. ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायदाचा वापर तुम्ही राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी करताय असा आरोप त्यांनी केला.

तसेच नवाब मलिक आजारी होते. १६ महिने आमदार, माजी मंत्री यांना जेलमध्ये ठेवले जाते. राजकीय विरोधकांविरोधात जो कायदा वापरला जातो तो ब्रिटीशांपेक्षा भयंकर आहे. या देशात कुणी देशद्रोही नाही. पुण्यात डॉ. प्रदीप कुरुळकर त्यांच्यावर देशद्रोहाचा कायदा लावला नाही. ज्याच्यावर कायदे लावायला हवे ते लावले जात नाही. कुरुळकर हे आरएसएसचे होते त्यांना वाचवण्यासाठी कायदा मागे घेतला का? असा सवालही खासदार संजय राऊत यांनी सरकारला विचारला.

दरम्यान, त्यांच्या हातात सत्ता, ईडी त्यामुळे सरकारे पाडली जाते. राजस्थानात पुन्हा एकदा अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार येईल असं वातावरण आहे. राजकीय विरोधकांचे सरकार चालू द्यायचे नाही ते पैशाच्या बळावर पाडायचे ही कोणती लोकशाही? सरकार पाडणे, ईडीचा गैरवापर करणे, राजकीय विरोधकांना अडकवणे हादेखील एकप्रकारचा देशद्रोह आहे असा आरोपही राऊतांनी केंद्र सरकारवर केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाnawab malikनवाब मलिक