शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

आज आनंद दिघे असते तर...; राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 08:57 IST

दाढी वाढवली म्हणून दिघे होतो असं नाही. आनंद दिघेंसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही असं राजन विचारेंनी म्हटलं.

मुंबई – आज आनंद दिघे असते तर ही गोष्ट कधीच घडली नसती. ही वेळ पण आणून दिली नसती. आनंद दिघेंच्या हंटरचा प्रसाद कित्येक लोकप्रतिनिधींनी खाल्ला आहे. दिघेंची आदरयुक्त भीती होती. उद्धव ठाकरे सरळ, साधा माणूस, आनंद दिघे गेल्यानंतर २२ वर्ष त्यांनी एका माणसावर संपूर्ण विश्वास ठेवला. सर्वकाही पदे दिले. तुम्हाला काय दिले नाही. पण विश्वासाचा विश्वासघात केला गेला. एवढे काही देऊन सुद्धा दुर्दैवाने तुम्ही असे करत असाल तर जनता माफ करणार नाही अशा शब्दात खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला आहे.

राजन विचारे म्हणाले की, ठाण्याला गद्दारीचा दुसरा कलंक लागलाय. २० फेब्रुवारी १९८९ साली त्यावेळी प्रकाश परांजपे महापौरपदाच्या निवडणुकीत उभे राहिले. तेव्हा ३ जणांनी गद्दारी केली. विश्वासघात झाल्यामुळे महापौर झाला नाही. त्यावेळी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी राजीनामा दिला होता. बाळासाहेबांच्या आदेशाने ३० जणांनी राजीनामे दिले होते. संख्याबळ असून सत्ता शिवसेनेच्या हातून गेली होती. आनंद दिघेंना टाडा अंतर्गत शिक्षा होऊन २ वर्ष तुरुंगात होते. गद्दारांना क्षमा नाही असं म्हटलं. त्यानंतर गद्दारांची हत्या झाली होती. लहान मुलांचा, महिला, ठाणेकर नागरिक, आदिवासींचा मोर्चा आनंद दिघेंच्या समर्थनार्थ निघाला. ती परिस्थिती वातावरण निर्माण झाले होते. प्रभाकर हेडगे तेव्हा ज्येष्ठ विधीतज्ज्ञ आहेत ते काँग्रेसचे होते तरीही त्यांनी दिघेंचे वकिलपत्र घेतले होते. आनंद दिघे सर्वांना न्याय देत होते असं त्यांनी सांगितले. शिवसेना आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये विचारेंची मुलाखत घेतली त्यात ते बोलत होते.

त्याचसोबत दाढी वाढवली म्हणून दिघे होतो असं नाही. आनंद दिघेंसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. तशी कामे करावी लागतात. आज खुर्चीसाठी आपल्याच लोकांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले जाते. दिघेंनी लोकांना घडवण्याचे काम केले, कुणाला उद्ध्वस्त केले नाही. आत्ताचे राजकारण घाणेरडे झाले आहे. यापुढे चांगली माणसे राजकारणात येणार नाहीत. ज्यांनी तुम्हाला घडवले त्यांनाच तुम्ही संपवायला निघालेत. ५७ वर्ष शिवसेना घडवण्यासाठी गेले. शिवसेना संघटनेसाठी कित्येकांचे बळी गेले, कुटुंब सोडून पक्षाचे काम करतायेत. ४० वर्षापूर्वी शाखा बांधली, त्यावर कब्जा करतायेत. आनंद दिघेंचे आनंदाश्रम नाव बदलतायेत. तुम्हाला लाज वाटतेय का? असा संतप्त सवालही विचारेंनी केला.

दरम्यान, गद्दारीला कुठेही थारा नव्हता. २० जून २०२२ ही तारीखही ठाणेकर विसरू शकत नाहीत. राजन विचारेच्या मागून शिवसेना ही ४ अक्षरे काढली तर माझी किंमत शून्य. मला बाळासाहेबांच्या विचारामुळे निवडून देतात. कित्येक शिवसैनिक ज्यांना आजपर्यंत काही मिळाले नाही. आज ते लोक उभे आहेत. पण तुम्हाला इतके सर्व देऊनही तुम्ही गद्दारी केली. त्यामुळे जनता तर माफ करणार नाही अन् परमेश्वरही तुम्हाला माफ करणार नाही. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला पक्षाने न मागताच सर्वकाही दिले. निष्ठावंताने हाच विचार करायला हवा असंही खासदार राजन विचारे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे