शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आज आनंद दिघे असते तर...; राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 08:57 IST

दाढी वाढवली म्हणून दिघे होतो असं नाही. आनंद दिघेंसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही असं राजन विचारेंनी म्हटलं.

मुंबई – आज आनंद दिघे असते तर ही गोष्ट कधीच घडली नसती. ही वेळ पण आणून दिली नसती. आनंद दिघेंच्या हंटरचा प्रसाद कित्येक लोकप्रतिनिधींनी खाल्ला आहे. दिघेंची आदरयुक्त भीती होती. उद्धव ठाकरे सरळ, साधा माणूस, आनंद दिघे गेल्यानंतर २२ वर्ष त्यांनी एका माणसावर संपूर्ण विश्वास ठेवला. सर्वकाही पदे दिले. तुम्हाला काय दिले नाही. पण विश्वासाचा विश्वासघात केला गेला. एवढे काही देऊन सुद्धा दुर्दैवाने तुम्ही असे करत असाल तर जनता माफ करणार नाही अशा शब्दात खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला आहे.

राजन विचारे म्हणाले की, ठाण्याला गद्दारीचा दुसरा कलंक लागलाय. २० फेब्रुवारी १९८९ साली त्यावेळी प्रकाश परांजपे महापौरपदाच्या निवडणुकीत उभे राहिले. तेव्हा ३ जणांनी गद्दारी केली. विश्वासघात झाल्यामुळे महापौर झाला नाही. त्यावेळी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी राजीनामा दिला होता. बाळासाहेबांच्या आदेशाने ३० जणांनी राजीनामे दिले होते. संख्याबळ असून सत्ता शिवसेनेच्या हातून गेली होती. आनंद दिघेंना टाडा अंतर्गत शिक्षा होऊन २ वर्ष तुरुंगात होते. गद्दारांना क्षमा नाही असं म्हटलं. त्यानंतर गद्दारांची हत्या झाली होती. लहान मुलांचा, महिला, ठाणेकर नागरिक, आदिवासींचा मोर्चा आनंद दिघेंच्या समर्थनार्थ निघाला. ती परिस्थिती वातावरण निर्माण झाले होते. प्रभाकर हेडगे तेव्हा ज्येष्ठ विधीतज्ज्ञ आहेत ते काँग्रेसचे होते तरीही त्यांनी दिघेंचे वकिलपत्र घेतले होते. आनंद दिघे सर्वांना न्याय देत होते असं त्यांनी सांगितले. शिवसेना आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये विचारेंची मुलाखत घेतली त्यात ते बोलत होते.

त्याचसोबत दाढी वाढवली म्हणून दिघे होतो असं नाही. आनंद दिघेंसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. तशी कामे करावी लागतात. आज खुर्चीसाठी आपल्याच लोकांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले जाते. दिघेंनी लोकांना घडवण्याचे काम केले, कुणाला उद्ध्वस्त केले नाही. आत्ताचे राजकारण घाणेरडे झाले आहे. यापुढे चांगली माणसे राजकारणात येणार नाहीत. ज्यांनी तुम्हाला घडवले त्यांनाच तुम्ही संपवायला निघालेत. ५७ वर्ष शिवसेना घडवण्यासाठी गेले. शिवसेना संघटनेसाठी कित्येकांचे बळी गेले, कुटुंब सोडून पक्षाचे काम करतायेत. ४० वर्षापूर्वी शाखा बांधली, त्यावर कब्जा करतायेत. आनंद दिघेंचे आनंदाश्रम नाव बदलतायेत. तुम्हाला लाज वाटतेय का? असा संतप्त सवालही विचारेंनी केला.

दरम्यान, गद्दारीला कुठेही थारा नव्हता. २० जून २०२२ ही तारीखही ठाणेकर विसरू शकत नाहीत. राजन विचारेच्या मागून शिवसेना ही ४ अक्षरे काढली तर माझी किंमत शून्य. मला बाळासाहेबांच्या विचारामुळे निवडून देतात. कित्येक शिवसैनिक ज्यांना आजपर्यंत काही मिळाले नाही. आज ते लोक उभे आहेत. पण तुम्हाला इतके सर्व देऊनही तुम्ही गद्दारी केली. त्यामुळे जनता तर माफ करणार नाही अन् परमेश्वरही तुम्हाला माफ करणार नाही. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला पक्षाने न मागताच सर्वकाही दिले. निष्ठावंताने हाच विचार करायला हवा असंही खासदार राजन विचारे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे