शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

रश्मी ठाकरेंना जेलमध्ये टाकलं जाईल तेव्हा विचारेन आता कसं वाटतंय?; नवनीत राणांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:40 IST

कुणाचं हिंदुत्व असली आणि नकली आहे हे शिवसेना ठरवू शकत नाही असं नवनीत राणांनी म्हटलं आहे.

नागपूर - आपले मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत. ते राज्याला कुठल्या दिशेला घेऊन जाणार? जर कोणी गुन्हा नसताना उगाच जेलमध्ये टाकत असेल तर ते योग्य नाही. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सत्तेचा दुरुपयोग केला. केवळ हनुमान चालीसा पठण करण्यास सांगितले म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं. परंतु यापुढे त्यांच्या हातात सत्ता नसेल आणि रश्मी ठाकरेंना जेलमध्ये टाकलं तर त्यांना विचारेन आता कसं वाटतंय? असा टोला खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

नवनीत राणा(Navneet Rana) म्हणाल्या की, कुणाचं हिंदुत्व असली आणि नकली आहे हे शिवसेना ठरवू शकत नाही. असली-नकलीवरून वाद त्यांच्याकडेच होत आहेत. लोकसभेत धार्मिक नारे देऊ नये कारण ती जागा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. हिंदुत्वाचा अजेंडा भाजपाचा नाही. हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येक हिंदूंचा आहे. इतकी वर्ष भाजपा हिंदुत्वाचा अजेंडावर काम करत आहे. मग जो मंदिरात जातो तो भाजपाच्या अजेंड्यावर काम करत असं थोडी असतं असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

तसेच गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना रोजगार दिले. शेतकऱ्यांचे हात बळकट केले. विकासाचं राजकारण केले. एकही विभाग असा नाही जो तोट्यात चालला होता. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मी आणि माझे पती आमदार रवी राणा ९ दिवस जेलमध्ये होतो. वीज दरात सूट मिळावी म्हणून आम्ही आंदोलन केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बेरोजगारीवर बोलत नाही. शेतकऱ्यांवर बोलत नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. 

दरम्यान, मागील २ वर्षापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाही. कोविड काळात पंतप्रधान, गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस, लोकप्रतिनिधी जमिनीवर उतरून काम करत होते. हॉस्पिटलला जात होते. लोकांच्या समस्या सोडवल्या जात होत्या असं सांगत बाळासाहेबांनंतर एकही शिवसैनिक असा नाही जो स्टेजवर उभं राहून हिंदुत्वाबाबत स्पष्ट बोलेल. बाळासाहेबांचे विचार कुठे गेले? असा सवाल नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना