शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Video: 'मावळ्यांनी बलिदान दिलं, ते किल्ले भाड्याने देणार?; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 12:34 IST

Maharashtra's Fort On Rent : हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, डेस्टिनेशन वेडिंगसाठी शिवकालीन किल्ले देण्याचा एमटीडीसीची योजना आहे.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे २५ गड-किल्ले भाड्याने देण्याची योजना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने आखली आहे. हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, डेस्टिनेशन वेडिंग यासाठी हे किल्ले देण्याचा त्यांचा विचार आहे. ही बातमी कळताच, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर 'आक्रमण' केलंय.  

ज्या मातीवर मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान पत्करलं, तिथे डेस्टिनेशन वेडिंगचे सोहळे रंगवण्याची योजना आखणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा संतप्त सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे. मावळ्यांच्या बलिदानाचा असा अपमान करण्याचा कोणता अधिकार सरकारला आहे?, असंही त्यांनी ठणकावलंय.

शिवकालीन गड-किल्ल्यांच्या विकासाला अजिबात विरोध नाही. उलट त्यांचा शाश्वत विकास व्हायला हवा. या किल्ल्यांवर म्युझियम होऊ शकतं, शिवसृष्टी उभी करता येऊ शकते, शिवचरित्राशी निगडित प्रसंग त्या-त्या किल्ल्यावर साकारता येऊ शकतो, पण जे करायचंय ते इतिहासाचं भान ठेवून आणि इतिहासाशी प्रामाणिक राहूनच केलं गेलं पाहिजे, असं अमोल कोल्हे यांनी निक्षून सांगितलं.  

डॉ. अमोल कोल्हे म्हणतात...

राज्यातील २५ किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग अशा पद्धतीने स्थळ विकसित करण्यात येणार आहे. अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह निर्णय आहे. सरकारला विचारावंसं वाटतं, डोकं ठिकाणावर आहे का? कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी यातला एकेक किल्ला, एकेक बुरूज, एकेक दरवाजा राखण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं त्या बलिदानाचा असा अपमान करण्याचा कोणता अधिकार सरकारला आहे? मिर्झाराजे जयसिंगाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला तेव्हा जेमतेम २० किल्ले दिले होते. औरंगजेबाला त्याच्या संपूर्ण हयातीत एकही किल्ला जिंकता आला नव्हता. पण, दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की, जे औरंगजेबाला जमलं नाही असा निर्णय सरकारने घेऊन दाखवला. राजस्थानचे किल्ले निवासी किल्ले, महाराष्ट्रातले किल्ले वॉर फोर्ट्स आहे, हा फरक लक्षात घेतला पाहिजे. या किल्ल्यांना डेस्टिनेशन वेडिंगची स्थळं आम्ही होऊ देणार नाही. 

या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग कोण करणार? ज्या उच्चभ्रूंना, श्रीमंत वर्गाला अशी डेस्टिनेशन वेडिंग परवडू शकतात, त्यापैकी किती जणांना आपल्या जाज्ज्वल इतिहासाविषयी चाड आहे, भान आहे, याचा सरकारने विचार केला पाहिजे. ज्या मातीवर मावळ्यांनी बलिदान पत्करलं होतं, त्याच ठिकाणी जर डेस्टिनेशन वेडिंगचे सोहळे रंगणार असतील तर सरकारने विचार करण्याची नितांत गरज आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगडMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस