शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

भीक नाही, हक्क मागतोय! नाहीतर, आम्ही तलवारी काढू; संभाजीराजेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:52 IST

‘मराठा क्रांती’च्या तिसऱ्या पर्वाला प्रारंभ

तुळजापूर : (जि़ उस्मानाबाद) : सरकार मग ते राज्यातील असो की केंद्रातील़ त्यांनी मराठा समाजाच्या भावना समजून घ्याव्यात़ आम्ही भीक नाही, हक्क मागतोय. कायदा हातात घ्यायचा नाही़ पण, तशी वेळ आणू नका़ आमच्याकडे साध्यासुध्या तलवारी नाहीत, असा इशारा खा़ संभाजीराजे यांनी शुक्रवारीयेथे दिला.मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शुक्रवारी तुळजापूर येथे खा. संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले़ तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनाच्या तिसºया पर्वाला सुरुवात करण्यात आली. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांचे होते़ पुढे छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण देऊन उन्नतीचा मार्ग दाखविला़ तेच स्वराज्य अन् तेच आरक्षण आता पुन्हा एकदा प्रस्थापित करायचे आहे. यासाठी हा लढा आहे़ सर्वोच्च न्यायालयाने आमच्या भावना समजून घ्याव्यात़ राज्य, केंद्र सरकारनेही त्या लक्षात घ्याव्यात.मराठा-ओबीसींत भांडणे लावण्याचा डाव...आपलेच काही लोक, पुढारी टीव्हीवर जे मिळेल ते पदरात पाडून घेऊ, असे बोलत आहेत़ त्यांचा समाजात दोन गट पाडण्याचा डाव हाणून पाडू़ तसेच मराठा-ओबीसी भांडणे लावण्यासाठी काही पुढारी टपूनच बसले आहेत त्याला बळी पडू नका, असे आवाहनही खा. संभाजीराजे यांनी केले़

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण